Suryakumar Yadav - Rohit Sharma Sakal
क्रिकेट

Suryakumar Yadav: 'मला फक्त पेपरवर कॅप्टन व्हायचं नाहीये, तर...' सूर्याचं टी२० नेतृत्वाबाबत मोठं भाष्य

Pranali Kodre

Suryakumar Yadav On Captaincy: सूर्यकुमार यादवकडे आता भारताच्या टी२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. रोहित शर्माने टी२० वर्ल्ड कप २०२४ नंतर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ही जबाबदारी सूर्यकुमारकडे सोपवण्यात आली आहे. सूर्यकुमारच्याही नेतृत्वात भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे.

सध्या त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध टी२० मालिका खेळ असून ग्वाल्हेरला झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. आता दुसरा सामना दिल्लीला ९ ऑक्टोबर रोजी होईल. त्याआधी सूर्यकुमारने त्याच्या नव्या भूमिकेबद्दल आणि रोहित शर्माकडून काय शिकायला मिळाले, याबाबत भाष्य केले आहे.

जिओसिनेमाशी बोलताना सूर्यकुमार म्हणाला, 'मी माझ्या नव्या भूमिकेचा आनंद घेत आहे. आमच्या प्रशिक्षकांनी आणि संघसहकाऱ्यांनी माझ्यासाठी नेतृत्व करणे सोपे केले आहे. मी माझ्या नव्या भूमिकेबाबत सकारात्मक आहे.'

'पण नेतृत्वाचा परिणाम मला माझ्या स्वभावावर होऊ द्यायचा नाही, मला मी जसा आधीपासून खेळत आहे, तसेच खेळणे कायम करायचे आहे. मला मैदानात आणि मैदानाबाहेर सारखेच रहायचे आहे.'

सूर्यकुमार पुढे म्हणाला, 'माझं तत्व इतकंच आहे की खेळाडूंना त्यांचा नैसर्गिक खेळ खेळण्याचे स्वातंत्र्य द्यायचे. जेव्हा तुम्ही भारतीय संघात येता, तेव्हा फक्त तुमची जर्सी बदलते, पण यश मिळवण्याची प्रेरणा तशीच असते.'

'मला संघाचे पुढे येऊन नेतृत्व करायचे आहे, मला फक्त कागदावर कर्णधार रहायचे नाही. मी नेहमीच माझ्या सिनियर्सकडून शिकण्याचा प्रयत्न केला आहे आणि आशा आहे की मी माझ्या आधीच्या कर्णधारांकडून शिकलेल्या गोष्टींची अंमलबजावणी करत असेल.'

त्याचबरोबर सूर्यकुमार रोहितबाबत म्हणाला, 'कानपूर कसोटीत रोहितला आक्रमक खेळताना पाहून असं वाटलं होतं की टी२० मालिका आत्ताच सुरू झाली आहे. जेव्हा दोन दिवसांपेक्षा अधिक वेळ वाया गेल्यानंतरही खूप कमी संघ आहेत, जे विजय कसोटीत निकाल लावू शकतात.'

'कानपूर कसोटी जिंकणे ही एका चांगल्या नेतृत्वाची खूण आहे. मी रोहितकडून नेतृत्वाबाबत खूप काही शिकलो आहे. मला आशा आहे की मी त्याच्याकडून शिकलेल्या गोष्टी माझ्या नेतृत्वातही वापरेल.'

त्याचबरोबर सूर्यकुमारने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबरोबरही खास बाँड असल्याचे सांगितले. तसेच त्याचा नेहमी पाठिंबा असतो असंही सांगताना तो म्हणाला त्याने काहीही न सांगताही तो त्याला समजून घेतो.

त्याचबरोबर सूर्यकुमारने सांगितले की जर खेळाडूंनी अतिरिक्त कोणती जबाबदारी घेतली, तर ती त्याला आवडते. जसे की फलंदाजांनी एक-दोन षटके गोलंदाजी करणे, यामुळे संघाची ताकद वाढते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitesh Rane: अटक टाळण्यासाठी नितेश राणेंची हायकोर्टात धाव; काय आहे प्रकरण?

हरियाना, जम्मू-काश्मीरचा निकाल, सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूबाबत खळबळजनक खुलासा, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

Women's T20 World Cup: हरमनप्रीत कौर उद्याचा सामना मुकणार? स्मृती मानधनाचं मोठं विधान; नेट रन रेटचं गणितही सांगितले

Haryana Election Results: ''हरियानामध्ये इतिहास घडला, यापूर्वी असं कधीच झालेलं नाही'' मोदींनी सांगितलं ५० वर्षांपासूनचं समीकरण

Sports Bulletin 8th October 2024: विनेश फोगाटची हरियाना निवडणूकीत बाजी ते BCCI समोर पाकिस्तानची शरणागती

SCROLL FOR NEXT