Yashasvi Jaiswal and Rishabh Pant  Sakal
क्रिकेट

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Pranali Kodre

India vs Bangladesh 1st test: चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश संघात गुरुवारपासून (१९ सप्टेंबर) पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यादरम्यान, भारताचा स्टार युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने मोठा कारनामा केला आहे.

या सामन्यात जैस्वालने पहिल्या डावात एका बाजूने झटपट विकेट्स जात असताना सुरुवातीला भारताचा डाव सांभाळला होता. त्याने ऋषभ पंतबरोबर चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारीही केली होती. यादरम्यान, त्याने ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. पण त्याला नाहिद राणाने बाद केले होते.

त्यानंतर दुसऱ्या डावात त्याला फार खास काही करता आले नाही आणि तो अवघे १० धावा करून नाहिद राणाविरुद्धच खेळताना यष्टीरक्षक लिटन दासकडे झेल देत बाद झाला. त्यामुळे या सामन्यात त्याला दोन्ही डावात मिळून ६६ धावा करता आल्या.

यशस्वी जैस्वाल दिग्गजांच्या यादीत सामील

ही जैस्वालची कारकिर्दीतील दहावा कसोटी सामना होता. त्यामुळे त्याने कारकि‍र्दीत पहिल्या १० कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या मार्क टेलर यांना मागे टाकत चौथा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या आता १० कसोटीत ६४.३५ च्या सरासरीने ३ शतके आणि ५ अर्धशतकांसह १०९४ धावा झाल्या आहेत.

त्यामुळे तो कारकिर्दीतील पहिल्या १० कसोटीत १००० धावांचा टप्पा पार करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी पहिल्या १० कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर सुनील गावसकरांच्या नावावर होता. त्यांनी पहिल्या १० कसोटीत ९७८ धावा केल्या होत्या.

तसेच कारकिर्दीतील पहिल्या १० कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या जगातील एकूण क्रिकेटपटूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर सर डॉन ब्रॅडमन आहेत. त्यांनी १४४६ धावा केल्या होत्या.

पहिल्या १० कसोटीत सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू

  • १४४६ धावा - डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया)

  • ११२५ धावा - इव्हर्टन विक्स (वेस्ट इंडिज)

  • ११०२ धावा - जॉर्ज हेडली (वेस्ट इंडिज)

  • १०९४ धावा- यशस्वी जैस्वाल (भारत)

  • १०८८ धावा - मार्क टेलर (ऑस्ट्रेलिया)

चेन्नई कसोटीत भारताचे पारडे जड

चेन्नई कसोटीत बांगलादेशने नाणेफेक जिंकली होती आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद ३७६ धावा केल्या, त्याच्या प्रत्युत्तरात बांगलादेश संघ पहिल्या डावात सर्वबाद १४९ धावाच करू शकला.

त्यामुळे भारताला २२७ धावांची आघाडी मिळाली. पण भारताने फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी भारतीय संघ पुन्हा दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला. मात्र दुसरा दिवस संपला, तेव्हा भारतानेही २३ षटकात ३ विकेट्स गमावल्या होत्या आणि ८१ धावा केल्या होत्या. पण भारताकडे दुसऱ्या दिवस अखेर ३०८ धावांची आघाडी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

IND vs BAN 1st Test : Shakib Al Hasanचं 'काळा' धागा चघळण्यामागचं मॅजिक; दिनेश कार्तिकनं उलगडलं लॉजिक

SCROLL FOR NEXT