RCB vs CSK Sakal
IPL

CSK vs RCB: चेन्नई कुठे कमी पडली, ज्यामुळे व्हावं लागलं IPL 2024 मधून बाहेर? आव्हान संपल्यानंतर काय म्हणाला कर्णधार ऋतुराज

Pranali Kodre

Ruturaj Gaikwad: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेच्या 68 व्या सामन्यात शनिवारी (18 मे) चेन्नई सुपर किंग्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 27 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. यासह चेन्नईचं आयपीएल 2024 मधील आव्हानही संपुष्टात आले.

या सामन्यात चेन्नईने 18 हून कमी धावांनी पराभव स्विकारला असता, तरी त्यांनी प्लेऑफमधील प्रवेश निश्चित केला असता. मात्र, प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी चेन्नईला अखेरच्या 2 चेंडूत 10 धावांची गरज होती. मात्र चेन्नईला एकच धाव घेता आली. त्यामुळे पराभवाबरोबरच चेन्नईचं या हंगामातील आव्हानही संपले.

दरम्यान, या हंगामाबद्दल आणि या सामन्याबद्दल चेन्नईचा नवा कर्णधार ऋतुराज गायकवाड व्यक्त झाला. त्याने यंदाच्या हंगामातील चेन्नईच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले असले, तरी प्लेऑफमध्ये न पोहचल्याबद्दल निराशा झाली असल्याचेही म्हटले.

त्याने बेंगळुरूविरुद्ध नियमित अंतराने विकेट्स गमावल्याचा चेन्नईला फटका बसल्याचे मान्य केले.

चेन्नईच्या या पराभवानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला, 'खरं सांगू तर खेळपट्टी चांगली होती. त्यावर चेंडू फिरत होता, पण मला वाटतं 200 धावा व्हायलाच पाहिजे होत्या. आम्ही नियमित अंतराने विकेट्स गमावल्या.'

'एक किंवा दोन शॉट्स लागले असते, तर फरक दिसला असता. टी20 सामन्यात असं होतं. मी 14 सामन्यांतील 7 विजय मिळवून खूश आहे, फक्त जर शेवटच्या दोन चेंडूत आम्ही अंतर पार करू शकलो नाही.'

तसेच ऋतुराजने म्हटले संघातील मुख्य खेळाडूंच्या दुखापतीचा परिणाम संघाच्या कामगिरीवरही पडला. तो म्हणाला, 'आमच्या संघात बऱ्याच दुखापती झाल्या. आमचे दोन प्रमुख गोलंदाज हंगामादरम्यान जखमी झाले. डेवॉन कॉनवेही यावेळी नव्हता. त्यामुळे महत्त्वाचे खेळाडू नसल्याने मोठा फरक पडतो.'

तो पुढे म्हणाला, 'मी चेन्नईच्या स्टाफला आणि सर्वांनाच श्रेय देईल की त्यांनी संपूर्ण हंगामात साथ दिली. पहिल्या सामन्यापासून अनेक आव्हानं आली. मुस्तफिजूर मध्ये गेला, पथिरानाला दुखापत झाल्या. अशावेळी संघात समतोल साधणं गरजेचं होतं.'

'आम्हाला शेवटच्या 2 चेंडूत 10 धावा हव्या होत्या, पण गोष्टी आमच्या बाजूने गेल्या नाहीत. माझ्यासाठी वैयक्तिक यशापेक्षाही संघाचा विजय महत्त्वाचा आहे. जर विजय मिळाला नाही, तर निराशा असतेच. तुम्ही एका हंगामात 100 करा किंवा 500-600, संघाचं जिंकणं महत्त्वाचं असतं. पराभवाबद्दल मी नक्कीच निराश आहे.'

या सामन्यात बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 218 धावा केल्या. त्यामुळे चेन्नईसमोर विजयासाठी 219 धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने 20 षटकात 7 बाद 191 धावा केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT