IPL 2025 sakal
IPL

IPL 2025 मेगा लिलावापूर्वी चर्चांच्या बाजारात धुराळा; सूर्या, रोहित, पंत नंतर आता 'हा' कर्णधार सोडणार संघांची साथ?

Kiran Mahanavar

यावेळी आयपीएलमधील खेळाडूंचा मोठा लिलाव होणार असून अनेक आयपीएल फ्रँचायझी नवीन कर्णधार बनवण्याच्या विचारात आहेत. भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा आणि या फॉरमॅटचा नवा भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यावर नजर आहे.

रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सची साथ?

आयपीएल 2025 च्या आधी अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. आता असे सांगण्यात येत आहे की मुंबई इंडियन्ससाठी पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा रोहित शर्मा आयपीएल 2025 पूर्वी फ्रेंचायझी सोडू शकतो.

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर नीता अंबानीने अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यात रोहितचे कौतुक केल्यानंतर असे वाटत होते की मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार संघात राहील, परंतु भारतीय संघातील अलीकडच्या घडामोडींनी हे सर्व काही बदलून गेले आहे. याचा परिणाम केवळ मुंबई इंडियन्सच नाही तर अनेक फ्रँचायझींवर होईल. आता होणाऱ्या या मोठ्या लिलावासाठी मुंबई इंडियन्स कोणती रणनीती आखणार हे पाहायचे आहे. रोहितने रिटेन्शनसाठी रस दाखवला नाही तर मुंबई काय करणार?

सूर्यकुमारचे काय होणार?

सूर्यकुमार यादवला टी-20 आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे, हे पाऊल भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी उचलले असे मानले जात आहे. बीसीसीआयने गंभीरला प्रशिक्षक बनवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याआधी रोहितचेही मत घेण्यात आले. रोहितने गंभीरच्या बाजूने मत दिले होते आणि त्याने मुख्य प्रशिक्षक बनताच हार्दिकच्या जागी सूर्यकुमारला टी-20 फॉरमॅटचा कर्णधार बनवण्याचे समर्थन केले.

यावर्षी मुंबई इंडियन्सने रोहितला हटवून हार्दिकची कर्णधारपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली होती, तेव्हा या दोन खेळाडूंमधील संबंध बिघडले होते. तर सूर्या रोहितच्या जवळचा मानला जातो. एवढेच नाही तर गंभीरच्या नेतृत्वाखाली तो केकेआरचा उपकर्णधारही राहिला आहे.

अशा परिस्थितीत मुंबईला आता टी-20 मध्ये भारताचा कर्णधार असलेल्या सूर्याला कोणत्याही किंमतीत कायम ठेवावे लागेल. या आयपीएलपर्यंत मुंबई हार्दिकला भावी कर्णधार मानत होती पण भविष्यातही तो असाच विचार करेल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

पंतचे काय होणार?

याशिवाय, दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंतवर फारसे खूश नसून त्याला कायम ठेवायचे की नाही याचा विचार करत असल्याचे सूत्रांकडून समोर आले आहे. पंतला सोडण्याचा विचारही या संघात सुरू आहे. मात्र, या संघाचा मार्गदर्शक आणि माजी कर्णधार सौरव गांगुली पंतला कर्णधारपदावर ठेवण्याच्या बाजूने आहे.

जर दिल्ली आणि पंत यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली तर महेंद्रसिंग धोनीची चेन्नई सुपर किंग्ज त्याला घेऊन जाऊ शकते. धोनी आणि पंत किती जवळचे आहेत हे कोणापासून लपलेले नाही. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर सीएसकेने यंदा ऋतुराज गायकवाडला कर्णधार बनवले.

राहुल लखनौमधून जाणार बाहेर?

लखनौ आणि राहुलचे संबंध काही चांगले दिसत नाहीत. गेल्या आयपीएल हंगामात एका सामन्यानंतर संघाचे मालक संजीव गोयंका आणि कर्णधार राहुल यांच्यात मैदानावर झालेल्या चर्चेचा व्हिडिओ खूप गाजला होता.

राहुल कर्नाटकचा असून आरसीबी त्याच्यावर सट्टा लावू शकतो. यावेळी आयपीएलपूर्वी मोठा लिलाव होणार असल्याने आणि बीसीसीआयने खेळाडूंना कायम ठेवण्याचे नियम अद्याप जारी केलेले नसल्यामुळे त्यानंतरच सर्व काही ठरवले जाईल कारण संघ त्यानुसार रणनीती बनवतील.

एका परदेशी खेळाडूसह चार खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी मिळाल्यास तीन भारतीय खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय मुंबईसाठी खूप कठीण जाईल. मेगा लिलावात पुढील पाच वर्षांसाठी सर्व संघ आपला संघ बांधण्याचा प्रयत्न करतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT