Ashadhi Wari 2024 esakal
लाइफस्टाइल

Ashadhi Wari 2024 : रेल्वे रूळावर सापडलेल्या पताकांनी कोल्हापुरातील कदम कुटुंबाला भक्तीमार्गाला लावलं!

सकाळ डिजिटल टीम

 Ashadhi Wari 2024 :

पंढरीच्या वारीला सुरूवात झाली आहे. आळंदी आणि देहू येथून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकोबाराय यांच्या पालख्या लवकरच पंढरपुरात पोहोचतील. राज्यभरातून येणाऱ्या दिंड्या  लवकरच पंढरपुरात पोहोचणार आहेत. वारीत सर्वच वारकऱ्यांच्या खांद्यावर भगव्या रंगाची पताका असते. ती खांद्यावर घेऊन ते पायी चालत असतात.

वारी केवळ एका मार्गाने चालणे नाही. तर, विठ्ठलाच्या नामघोषात केलेला तो एक सुखद प्रवास आहे. वारीत वारकरी परंपरागत चालत आलेली पताका खांद्यावर घेऊन वारी करतात. पंढरीत पोहोचल्यावर पताकांना चंद्रभागा नदीत पताकांना स्नान घालतात. आणि पुन्हा ती पताका आपल्या घरातल्या देव्हाऱ्यावर ठेवतात. (Ashadhi Wari 2024)

आज आम्ही तुम्हाला एका अशा कुटुंबाबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी वाटेत सापडलेल्या पताका सांभाळून १३० वर्षांपासून वारी करत आहेत.नक्की काय आहे ही गोष्ट आपण जाणून घेऊयात.

साधारण १२० वर्षांपासून कोल्हापुरातील लोहाळ मळा या भागात गिरजाई आणि शंकर कदम- तावडे यांच कुटुंब राहत आहे. शकंर कदम आणि गिरजाई यांची आता चौथी पिढी या गावात राहते. त्यापैकी अशोक कदम हे शंकर आणि गिरजाई यांचे नातू आहेत. ते या पताकांबद्दल सांगतात की, पुर्वीपासून आमच्या घरात वारीची परंपरा नव्हती.

म्हणजे शंकर यांचे वडील रावजी कदम हे उचगाव परिसरात वास्तव्यास होते. या गावाच्या आणि लोहार मळ्याच्या मधून एक रेल्वे रूळ गेला आहे. त्या रेल्वे रूळावर एक दिवस यांना ही पताका सापडली. त्यांनी ती घरी आणली आणि या पताका आमच्या घरातील देव्हाऱ्यात स्थानापन्न झाल्या त्या कायमच्या.

अशोक यांचे पणजोबा रावजी कदम यांनी पताका घेऊन वारी केली. त्यानंतर पुढे सून गिरजाई आणि मुलगा शंकर यांनीही वारी सुरू ठेवली. ही वारी केवळ कदम कुटुंबियांइतकी मर्यादीत राहीली नाही. तर, त्याला दिंडीचेही स्वरूप आलेले. भागातील लोकांना एकत्र घेऊन गिरजाईंसोबत पायी दिंडी सोहळा पंढरपुरापर्यंत जायचा.

मराठी मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ यातील राणादांचे वस्ताद म्हणून काम केलेले कलाकार मारूती माळी यांनीही या दिंडीच्या आठवणी सांगितल्या होत्या. त्यांनी सांगितले होते की, आम्ही लहान होतो तेव्हा मुडशिंगी,उचगाव भागातील दिंडी पंढरपुरला जायची. त्या वारीला गिरजा आज्जीसोबत अनेक लोक असायचे. लहानपणी मीही अनेकवेळा कदम कुटुंबियांसोबत ही वारी केली आहे.

गिरजाई-शंकर यांच्या मृत्यूपश्चात कदम घराण्यातील अनेकांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली. गिरजाई आणि शंकर यांना पाच मुलं त्यांनीही वारी केली. आणि त्यानंतरच्या पिढीनेही या पताका दर आषाढी एकादशीला पंढरपुरात नेऊन न्हाऊ घालून आणल्या.

या पताकांबद्दल अशोक कदम म्हणतात की, या पताका कुणाच्या आहेत याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. पण, ज्याच्या असतील त्याचे नशिब किती थोर आहे की त्यांच्या घराण्यातील अनमोल ठेवा अचानक आमच्या जीवनात आला. या पताका आमच्या घरी असाव्या अन् त्यांची आम्ही मनोभावे पूजा करून वारी करावी ही श्री विठ्ठलाचीच इच्छा असेल.

या पताका घरी नेऊन आम्ही एक वारकरी जेवू घालतो. काही वर्ष आम्ही श्रावणात संत ज्ञानेश्वरी, संत तुकाराम महारांचे ग्रंथ वाचले आहेत. भजन किर्तनही चालायचे घरी. या संपूर्ण सोहळ्यात माझे कुटुंबिय नेहमी उत्साहाने भाग घ्यायचे, असेही अशोक कदम यांनी सांगितले.

कोल्हापुरातील कदम कुटुंबियांना भागातील लोक तावडे म्हणूनही ओळखतात. कारण, कदम यांचे अडनाव उर्फ तावडे असेही होते. कदम कुटुंबियाचा उदरनिर्वाह अनेक वर्ष कोल्हापुरातील प्रसिद्ध अशा तावडे हॉटेलवर चालत होता. पण काळाच्या ओघात हे हॉटेल मागे पडले अन् आता त्याचे नाव मात्र अजरामर झाले आहे. ही या भक्तीमार्गाचीच कृपा आहे असे कदम कुटुंबिय म्हणतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT