Finger astrology Tips esakal
लाइफस्टाइल

Finger Astrology Tips : हाताची बोटंच करतात तुमच्या आरोग्याची भविष्यवाणी; कसे ते पहा!

Pooja Karande-Kadam

Finger Astrology Tips: भारतामध्ये हस्तरेषाशास्त्राला महत्त्वाचे मानले जाते. अनेक लोक कोणतेही महत्वाचे काम करण्याअगोदर किंवा आपल्या भविष्याविषयी जाणून घेण्यासाठी हस्तरेषा शास्त्राचा आधार घेतात. एखाद्या व्यक्तीच्या हाताच्या रेषाच नव्हे तर त्याच्या शरीराचे विविध भागही खूप काही सांगून जातात.

शरीराचा आकार, रूप, रंग आपल्या व्यक्तिमत्त्वाची माहिती देतात. लांब कान असणारी व्यक्ती नशीबवान असते आणि लांब पंजे असलेली तीच व्यक्ती हुशार असते, असे आपण आपल्या वडिलधाऱ्यांच्या तोंडून अनेकवेळा ऐकले असेल.

हाताची बोटे देखील शरीराच्या सर्व भागांमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. बोटांच्या पोताच्या आधारे एखाद्या व्यक्तीला कोणत्या प्रकारच्या आजारांनी ग्रासले जाऊ शकते आणि त्याचे व्यक्तिमत्त्व कोणत्या प्रकारचे आहे हे आपण जाणून घेऊ शकता.

सरळ बोटे

सरळ बोटांनी हात उत्तम मानले जातात, अशा व्यक्तींना मोठे आजार होण्याची शक्यता कमी असते, त्यांच्या कामात कमी अडथळा येतो आणि आरोग्यासाठी फायदे मिळतात.

लहान बोटे

लहान बोटं असलेले लोक आळशी स्वभावाचे मानले जातात. तसंच या लोकांना लॅविश लाईफ जगायला आवडतं. तसेच, या लोकांचे छंद खूप महाग असतात आणि ते पैसे खर्च करण्यावर विश्वास ठेवतात. तसेच ज्या लोकांची करंगळी सुंदर दिसते, ते सर्व गुणांनी संपन्न आणि कलाप्रेमी आणि कला जाणकार असतात.

लांब बोटे
लांब बोटे असणारे लोक रोगांना संवेदनशील असतात, त्यामुळे त्यांना आजार लवकर होतात, हंगामी आजार लवकर पकडतात, तसेच अशा लोकांनी खाण्यापिण्याची पूर्ण काळजी घ्यावी.

 हाताचे मधले बोट

सामुद्रिक शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या हाताचे मधले बोट बाकीच्या बोटांपेक्षा मोठे असेल तर असे लोक खूप प्रामाणिक आणि समर्पित असतात. हे लोक अतिशय गंभीर स्वभावाचे असतात आणि प्रत्येक काम मोठ्या समर्पणाने पूर्ण करतात. अशा लोकांना इतरांची फारशी पर्वा नसते. हे लोक खूप आनंदी असतात आणि ते प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात.

बारीक बोटे

बारीक बोटे असलेल्या व्यक्तीला कोणताही मोठा किंवा दीर्घकालीन आजार नसतो, तरीही हे लोक संवेदनशील असतात. हेच कारण आहे की जेव्हा जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा त्यांना हंगामी आजारांचा त्रास होतो, परंतु काही दिवसांनंतर ते बरेही होतात.

मऊ आणि लवचिक बोटे

मऊ आणि लवचिक बोटे असणारे लोक हवामानातील किरकोळ चढ-उतारासह सर्दी, ताप इत्यादी तक्रारींनी अस्वस्थ होतात. जागा बदलणेही त्यांच्यासाठी अनुकूल नसते, इतर ठिकाणी ते लवकर आजारी पडतात, म्हणून त्यांनी प्रत्येक ऋतूत आणि हवामान बदलताना आणि प्रवासादरम्यान किंवा जागा बदलताना आरोग्याविषयी जागरूक राहिले पाहिजे.

जाड बोटं असलेले लोक

जाड बोटं असलेले लोक काम आणि नातेसंबंधांबाबत खूप गंभीर असतात. असे लोक कंजूष असतात आणि त्यांना पैसे कसे वाचवायचे हे माहित असते. असे लोक रागीट स्वभावाचे असतात आणि लहानसहान गोष्टींवर त्यांना लवकर राग येतो.

तसेच करंगळी आणि अनामिका दोन्ही समान असल्यास ती व्यक्ती राजकारणाच्या क्षेत्रात जातात, असे लोक चांगले राजकारणी होऊ शकतात, असं म्हटलं जातं. हे लोक स्पष्टवक्ते, धैर्यवान आणि निर्भय देखील असतात आणि या लोकांना व्यवसायात रिस्क कशी घ्यावी हे माहित असतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT