Copper Water Bottles Harmful esakal
लाइफस्टाइल

Copper Water Bottles Harmful : कोणाचं तर ऐकूण तुम्हीही तांब्याच्या बाटलीतलं पाणी पिताय का?आधी हे वाचा

तांब्याच्या भांड्यातून पाणी पिल्याने होऊ शकतात गंभीर आजार

Pooja Karande-Kadam

Copper Water Bottles Harmful : तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी शरीरासाठी एखाद्या औषधासारखे काम करते. विशेषतः हिवाळ्याच्या दिवसांत हे पाणी अमृत ठरते, कारण तांब्याचा गुणधर्म गरम असतो. यामुळे शरीराला ऊब मिळण्यासोबतच ऊर्जा, हलकेपणा आणि ताजेपणा जाणवतो.

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती आणि पचनशक्ती मजबूत होते. याशिवाय वजन कमी करणे, सांधेदुखी, कोलेस्टेरॉल, हाय ब्लड प्रेशर यावरही हे पाणी फायदेशीर आहे.

तांबे शरीरासाठी फायदे एक धातू आहे जो आपल्या शरीरास लाल रक्तपेशी (आरबीसी) बनविण्यात मदत करतो आणि मज्जातंतू पेशी आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवतो. हे कोलेजन, हाडे आणि ऊती तयार करण्यास देखील मदत करते.(Side effects of drinking water from copper bottle daily)

तांबे देखील एक अँटीऑक्सिडेंट आहे जे पेशी आणि डीएनएचे नुकसान करणारे मुक्त रॅडिकल्स कमी करू शकते. इतकंच नाही तर कॉपर शरीराला लोह शोषून घेण्यास मदत करते. प्रश्न असा आहे की या फायद्यांसाठी आपण दररोज तांब्याच्या बाटलीचे पाणी प्यावे का?

अनेक फायदे असले तरी तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याच्या वापरा दरम्यान काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा तांब्याचे पाणी आरोग्याला हानी पोहोचवू शकते.

आपण दिवसभर तांब्याच्या बाटलीतलं पाणी पिऊ शकतो का?

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ऑफ डायटरी सप्लीमेंट्सच्या मते तांब्याच्या बाटलीत ठेवलेले पाणी पिणे फायदेशीर आहे, परंतु प्रत्येक वेळी नाही. कारण यामुळे शरीरात तांब्याची विषबाधा होऊ शकते. ज्यामुळे शरीराला हानी पोहोचू शकते. इतकंच नाही तर या बाटलीत रोज पाणी ठेवल्याने गंजही येऊ शकतो, ज्यामुळे ही समस्या आणखी वाढू शकते.

दुष्परिणाम?

असे होते की जेव्हा आपण दररोज तांब्याच्या बाटलीत पाणी पिण्यास सुरवात करतो तेव्हा तांबे रक्तात जाऊ लागते आणि मूत्रपिंड आणि यकृत खराब होते. तांब्याचे कण किंवा स्फटिक श्वास घेतल्यास आपल्या नाक आणि घशात जळजळ होऊ शकते. यामुळे आपल्याला चक्कर येणे आणि डोकेदुखी सारखी लक्षणे दिसू शकतात.

तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे नियम

तांब्याच्या भांड्यातील पाण्याशी संबंधित नियमांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वप्रथम तांब्याच्या बाटलीत रात्रभर ६-८ तास पाणी ठेवून सकाळी त्याचे पाणी प्यावे. याशिवाय पाण्याच्या बाटली दिवसातून फक्त 6 ते 8 वेळाच पाणी प्यावे. इतर वेळी साध्या भाड्यातून पाणी प्यावे.

का पिऊ नये जास्त पाणी 

जर तुम्ही दिवसभर तांब्याच्या बाटलीत किंवा भांड्यात ठेवलेले पाणी पीत असाल तर तुमच्या शरीरात तांब्याचे प्रमाण जास्त होण्याची शक्यता असते. यामुळे लिव्हर आणि किडनी निकामी होण्याच्या धोक्यासोबतच गंभीर मळमळ, चक्कर येणे, पोटात दुखणे या समस्या देखील होऊ शकतात.

लिंबू मध बनेल विष

सकाळी रिकाम्या पोटी लिंबू आणि मध मिसळलेले पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पण तांब्याच्या भांड्यात लिंबू व मध घातलेले हे पाणी प्यायल्यावर ते विषासारखे काम करते. वास्तविक, लिंबूमध्ये आढळणारे अॅसिड तांब्यासोबत मिक्स होऊन शरीरात अॅसिड तयार होते, ज्यामुळे पोटदुखी, पोटात गॅस आणि उलट्या होण्याचा धोका असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Candidate List: काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; सांगलीतून पृथ्वीराज पाटील, 'कोल्हापूर उत्तर'मधून 'यांना' संधी

Washim Assembly election: उमेदवारी नाकारल्याने आमदार मलिक यांना अश्रू अनावर; कार्यकर्त्यांना बोलून भूमिका घेणार असल्याचा इशारा

चांगल्या पगाराची नोकरी, उत्तम वर्क लाईफ बॅलन्स शिवाय क्रिकेटही.. सगळं काही जर्मनीमध्ये

Yeola Assembly Election 2024: येवल्यात भुजबळांविरोधात शरद पवारांचा जरांगे पॅटर्न; शिंदेंना मैदानात उतरवून मोठी खेळी

Ulhasnagar Assembly Elections 2024: पुन्हा 'कलानी' विरुद्ध 'आयलानी' आमनासामना

SCROLL FOR NEXT