Animal Care Tips Sakal
लाइफस्टाइल

Animal Care: दुभत्या जनावरांचे सांभाळा आरोग्य, पावसाळ्यात संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

Animal Care: पावसाळ्यात जनावरांमध्ये संसर्गजन्य आजार होण्याची व पसरण्याची शक्यता असते. सतत साचणाऱ्या पाण्यामुळे वातावरण दमट बनते. हवेतील ओलसरपणा वाढतो. यामुळे जिवाणू व विषाणूच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होत. त्यामुळे या काळातच जनावरांमध्ये संसर्गजन्य आजाराची बाधा होऊ शकतो. जनावरांना घटसर्प, लाळ्या खुरकूत, फऱ्या हे आजार झाल्यास त्यांचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. हे टाळण्यासाठी जनावरांची काळजी घेणे आवश्यक असते.

स्वच्छ गोठा असावा

पावसाळ्यात गोठा स्वच्छ असावा. खेळती हवा व भरपूर सूर्यप्रकाश येईल अशी गोठ्याची रचना असावी. गोठ्यामध्ये उतार काढलेला असावा, जेणेकरून गोमूत्र, पाण्याचा निचरा होईल. गोठ्यातील खाच-खळगे बुजवून घ्यावेत. गोठा जास्तीत जास्त कोरडा ठेवावा. गोठ्यात सतत ओलसरपणा राहिल्यामुळे जनावरांना खुराचे आजार होतात.

गोठ्यामध्ये जमिनीपासून चार ते पाच फुटांपर्यंत चुना लावावा. त्यामुळे गोठा जंतूविरहित राहण्यास मदत होते. गोठ्यामध्ये जंतुनाशक द्रावणाची फवारणी करावी. लहान वासरे, करडे यांना कोरड्या आणि उबदार जागेवर बांधावे. बसण्यासाठी वाळलेले गवत, पाचट किंवा पोत्यांचा वापर करावा.

निरोगी जनावरे लांब ठेवावी

एखादे जनावर आजारी असल्यावर ते निरोगी जनावरे, लहान वासरांपासून लांब आणि वेगळे बांधावे. अशा जनावरांवर वेळेत उपचार करून घ्यावेत. गाभण जनावर असल्यास गोठ्यामध्ये बसण्यासाठी गवताचा गादी प्रमाणे वापर करावा.

दूध काढण्याची जागा स्वच्छ असावी. दूध काढताना जमिनीवर कुठलाही कचरा अगर शेण असू नये. गोठ्यात ओलसरपणा जास्त प्रमाणात राहिल्यास यामध्ये जंतूची वाढ झपाट्याने होते.

जनावरांच्या कासेला जंतूसंसर्ग

जनावरांच्या कासेला जंतूसंसर्ग होऊन कासदाह होतो. म्हणून गोठा कोरडा राहील याची काळजी घ्यावी. दूध काढून झाल्यानंतर सड जंतुनाशक द्रावणात बुडवावेत. त्यामुळे सडात होणारा जंतूसंसर्ग टाळता येईल. पावसाळ्यामध्ये जनावरांना नुसता हिरवा चारा न देता आहारात कोरड्या चाऱ्यासह खनिज मिश्रणाचा समावेश करावा. फक्त कोवळा हिरवा चारा खाल्यामुळे जनावरांमध्ये पोटफुगी सारख्या समस्या उद्भवतात.

लसीकरणापूर्वी एक आठवडा आधी जंतनिर्मूलन करावे. त्यानंतर लसीकरण करावे. पशुखाद्य कोरड्या जागी ठेवावे. पशुखाद्याची वारंवार तपासणी करावी जेणेकरून त्याला बुरशी लागणार नाही. पावसाळ्यात जनावरांना फऱ्या, घटसर्प, लाळ्या खुरकूत यांसारखे आजार होऊ शकतात. नवीन हिरव्या चाऱ्यामुळे पोटफुगी, जंतांचा प्रादुर्भाव होतो. गढूळ पाण्यामुळे रोगजंतूंचा प्रादुर्भाव वाढतो. गोचीड, माशांचे प्रमाण वाढते. त्यामुळे पावसाळ्यात जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT