curd  sakal
लाइफस्टाइल

Health Care News: दह्यात ही पांढरी गोष्ट मिसळून कधीही खाऊ नका, नाहीतर...

Aishwarya Musale

मोठ्या संख्येने लोक त्यांच्या रोजच्या आहारात दह्याचा नक्कीच समावेश करतात. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. दही खायला खूप चविष्ट आहे आणि अनेक पदार्थांमध्ये वापरले जाते. मीठ किंवा साखर घालून दही खाणे सामान्य आहे. बहुतेक लोक असे करतात, परंतु आयुर्वेदात दही खाण्याबाबत अनेक आश्चर्यकारक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. काही गोष्टी दह्यात मिसळू नयेत असे सांगितले जाते. असे करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

दही खाण्याबाबत निष्काळजीपणामुळे लहान वयातच लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत दह्याचे सेवन सावधगिरीने करणे गरजेचे आहे. आज आपण आयुर्वेदिक तज्ञांकडून जाणून घेणार आहोत की दह्यात मिसळलेल्या कोणत्या गोष्टी हानिकारक आहेत आणि कोणत्या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात. याशिवाय दही कधी खावे आणि कधी खाऊ नये?

तज्ज्ञांच्या मते, दही हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, पण ते योग्य पद्धतीने सेवन केले पाहिजे. आयुर्वेदानुसार दही हे उष्ण असून त्याची प्रकृती आम्लयुक्त असते. उन्हाळा आणि पावसाळ्यात दही कमी खावे. बहुतेक लोकांना काहीही न घालता दही खायला आवडते, परंतु असे करणे हानिकारक असू शकते.

साधे दही आपले रक्त दूषित करून त्वचेचे आजार होऊ शकते. आयुर्वेदानुसार दिवसा दही सेवन करावे आणि रात्री दही खाणे टाळावे. रात्री दही खाल्ल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो. दही कोणत्याही ऋतूत जास्त प्रमाणात सेवन करू नये.

मीठ मिसळून दही खाणे हानिकारक आहे

तज्ज्ञांच्या मते, मोठ्या प्रमाणात लोकांना मीठ घालून दही खायला आवडते, पण ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. दही हे गरम असते आणि ते मीठ मिसळून खाल्ल्याने त्वचेच्या समस्या, केस गळणे, केस अकाली पांढरे होणे आणि गळणे अशा समस्या होऊ शकतात.

विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्यात याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही अधूनमधून मीठ मिसळून दही खाऊ शकता, पण तुम्ही असे रोज करू नये. दही आणि दूध एकत्र सेवन करू नये. असे करणे देखील आरोग्यासाठी चांगले नाही.

आता तुम्ही विचार करत असाल की दहीमध्ये काहीही न घालता खाऊ नये आणि त्यात मीठ घालूनही खाऊ नये, मग दही कसे खावे. या प्रश्नावर आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात की, तुम्ही साखर आणि गूळ मिसळून दही खाऊ शकता. दह्यामध्ये साखर घातली की त्याची चव मस्त लागते आणि प्रत्येक ऋतूत ते सेवन करता येते.

मात्र, साखरेपेक्षा दह्यात गूळ मिसळून खाणे अधिक फायदेशीर ठरते. यातून तुमच्या शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. याशिवाय मुगाची डाळ, अंबाडीच्या बिया, देशी तूप आणि आवळा मिसळून दही खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. यामुळे कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि बद्धकोष्ठता या समस्यांपासून आराम मिळू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS W vs SA W: गतविजेता ऑस्ट्रेलिया 15 सामन्यानंतर मोक्याच्या क्षणी हरला; दक्षिण आफ्रिकेने इतिहास घडवला

Hamas Chief Death: हमास प्रमुख याह्या सिनवर इस्राईल लष्कराच्या हल्ल्यात ठार; पंतप्रधान नेत्यानाहूंची घोषणा

Baba Siddiqui Case: मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये, आरोपी शिवकुमार गौतम आणि जीशान अख्तरच्या विरोधात लुक आउट सर्कुलर जारी

Navi Mumbai Assembly Elections: नवी मुंबईत महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; शरद पवार गट नवा डाव खेळणार!

IND vs NZ: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्व बदलाचा फैसला झाला! न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा

SCROLL FOR NEXT