one stop centre scheme
one stop centre scheme sakal
लाइफस्टाइल

‘वन स्टॉप’ आधार

सकाळ वृत्तसेवा

पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी, तसेच संकटकाळात या महिलांना आधार वैद्यकीय उपचारांसह सर्व सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात आणि त्याद्वारे त्यांना आधार मिळावा, या उद्देशाने राज्यात ‘वन स्टॉप सेंटर’ ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

महिलांवर होणारे शारीरिक आणि मानसिक अत्याचार, आर्थिक छळवणूक, समाजाकडून होणारा त्रास आणि अवहेलना, अशा संकटांत त्या महिलेस आणि तिच्या कुटुंबीयांस न्याय मिळविण्यासाठी; तसेच वैद्यकीय उपचारांसाठी शासनाच्या विविध विभागांमध्ये जावे लागत असल्याने अशा संकटग्रस्त महिलांसाठी आवश्यक उपचार आणि मदत एकाच छताखाली मिळावी, या उद्देशाने ही योजना राज्य सरकारने लागू केली आहे.

हिंसाचारामुळे पीडित आणि संकटात असलेल्या महिला, गरजू स्त्रिया त्यांच्यासह हिंसाचाराने प्रभावित त्यांच्या मुलांसह (सर्व वयोगटातील मुली आणि १२ वर्षांपर्यंतची मुले) जास्तीत जास्त पाच दिवसांच्या कालावधीसाठी ‘वन स्टॉप सेंटर’ या केंद्रामध्ये तात्पुरता निवारा घेऊ शकतात.

पीडित गरजू महिला आणि हिंसाचाराने प्रभावित झालेल्यांना त्यांच्या मुलांना मदत आणि आधार देणे, तसेच वैद्यकीय उपचार, समुपदेशन, पोलिस सहायक, मानसोपचार, कायदेशीर सुविधा, तात्पुरता निवारा, अन्न उपलब्ध करून देणे हा या केंद्राचा उद्देश आहे.

महिलांवर होणारे शारीरिक व मानसिक अत्याचार, आर्थिक छळवणूक समाजाकडून होणारा त्रास, अशा संकट काळात न्याय मिळविण्यासाठी महिलांना आणि तिच्या कुटुंबीयांना आतापर्यंत शासनाच्या विविध विभागांमध्ये फेऱ्या माराव्या लागत होत्या; परंतु आता या केंद्रातच आवश्यक उपचार आणि मदत, सुविधा उपलब्ध होत आहेत.

सध्या राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांमध्ये ३७ केंद्रे कार्यरत आहेत. या योजनेअंतर्गत संबंधित महिलेस वैद्यकीय उपचार, समुपदेशन, पोलिस साह्य, मानसोपचार, विधी साह्य, अल्प कालावधीसाठी निवारा आणि अन्न अशा सुविधा पुरविण्याची तरतूद आहे.

अधिक माहितीसाठी - https://csr.wcdcommpune.com/index.php/mr/schemes/vana-sataopa-saentara-yaojanaa

(शब्दांकन : मीनाक्षी गुरव)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Reply to Aditya Thackeray: "वर्ल्डकप फायनल मुंबई बाहेर नेऊ नका" म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना BCCIचं उत्तर

Agriculture State Award: महाराष्ट्राला सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार जाहीर! CM एकनाथ शिंदे स्वीकारणार ...

Virat Kohli : रोहितला सांगितलं मला काही विश्वास वाटत नाहीये.... पंतप्रधानांशी बोलताना विराटने केला मोठा खुलासा

Team India Prize: महाराष्ट्र शासनाकडून जगज्जेत्या टीम इंडियाला 11 कोटींचं बक्षीस, मुख्यमंत्री शिंदेची मोठी घोषणा

Maharashtra Live News Updates : माविआचा लवकरच मुंबईत संयुक्त मेळावा होणार

SCROLL FOR NEXT