Shardiya Navratri 2024: Sakal
लाइफस्टाइल

Shardiya Navratri 2024: नवरात्रीत कांदा अन् लसूण खाणे टाळल्यास पचनासह मानसिक आरोग्यही राहते निरोगी

पुजा बोनकिले

Shardiya Navratri 2024: हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खुप महत्व आहे. शारदीय नवरात्रीला फक्त एक दिवस बाकी राहीला आहे. नऊ रात्रीत नऊ दिवस माता दुर्गच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. तसेच मान्यतेनुसार माता दुर्गाची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. माता देवीचे भक्त नवरात्रीत नऊ दिवस उपवास करतात. नवरात्रीत उत्साही आणि निरोगी राहण्यासाठी आरोग्याची काळजी घ्यावी. नवरात्री दरम्यान कांदा आणि लसूण खाणे टाळावे. कारण आयुर्वेदात याला तामसिक पदार्थ मानले जाते. हे दोन्ही पदार्थ गरम असतात. यामुळे पोटासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. नवरात्रीत लसूण आणि कांदा न खाल्यास शरीराला कोणते फायदे मिळतात हे जाणून घेऊया.

पचन सुलभ होते

अनेक लोकांना कांदा आणि लसूण खायला आवडते. पण नवरात्रीत हे दोन्ही पदार्थ खाणे टाळावे. कारण कांदा, लसूण खाल्यास अनेकांना पचनासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. त्यात फ्रक्टन्सचा समावेश होतो जे एक प्रकारचे कार्बोहायड्रेट आहेत. जे काही लोकांना पचत नाही. नवरात्रीच्या काळात हे दोन्ही पदार्थ खाणे टाळल्यास पचनशक्ती सुरळितपणे कार्य करते. अमेरिकन जर्नल ऑफ गॅस्ट्रोअॅन्टेरोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, काही पचण्यास कठीण खाद्यपदार्थ कमी केल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल त्रासदायक भावना कमी होण्यास मदत होईल. यामुळे पचन सुलभ होईल आणि उपवासा दरम्यान कोणताही त्रास होणार नाही.

मानसिक आरोग्य निरोगी राहते

आयुर्वेदानुसार कांदे आणि लसूण यांसारखे तामसिक पदार्थ अतिप्रमाणात खाल्यास मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आध्यात्मिक शक्ती वाढवण्यावर भर द्यावा. हे पदार्थ खाणे टाळल्यास मन शांत आणि स्थिर राहते. संशोधनानुसार असे समोर आले की योग्य आहार घेतल्यास त्याचा शरीरावर आणि मानसिकतेवर परिणाम होतो.

शरीराचे तापमान संतुलित राहते

आयुर्वेदानुसार, कांदा आणि लसूण दोन्ही पदार्थ गरम असतात. यामुळे पित्ताचा त्रास वाढू शकतो. तसेच शरीराची उष्णता वाढल्याने चेहऱ्यावर फोड येणे किंवा जिभेला फोड येणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. नवरात्री दरम्यान उपवास करत असाल तर शरीराचे तापमान संतुलित ठेवणे गरजेचे आहे. नवरात्रीत उपवासात हलके आणि साधे खाद्यपदार्थ खावे. यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते.

आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते

कांदा आणि लसूण खाणे आरोग्यदायी असले तरी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कांदा आणि लसूण खाणे टाळावे. यामुळे आरोग्य निरोगी राहू शकते. कारण कांदा आणि लसूण अतिप्रमाणात खाल्यास पोटासंबंधित समस्या वाढू शकतात. हे दान्ही पदार्थ गरम असल्याने शरीराची उष्णता वाढू शकते.

आध्यात्मिक शुद्धता

नवरात्रीला हिंदू धर्मात खुप महत्व आहे. हा एक पवित्र सण मानला जातो. या दिवसांमध्ये लसूण आणि कांदा खाणे अशुद्ध मानले जाते. यामुळे या पादर्थांचे सेवन टाळून आध्यात्मिक शुद्धता राखू शकता. यामुळे शारिरीक आणि मानसिक आरोग्य निरोगी राहते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीसांसोबतची बैठक निष्फळ, तुतारी हाती घेण्याचं बड्या नेत्यानं केलं निश्चित, कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु

Badlapur School Crime: कोर्टानं कालच अटकपूर्व जामीन फेटाळला अन् आज शाळेच्या दोन्ही फरार विश्वस्तांना झाली अटक

Mohammad Shami: हात जोडून विनंती करतो...! मोहम्मद शमी संतापला, 'त्या' वृत्ताचा केला इन्कार

Pune Crime: पुण्यात भयंकर प्रकार! बिल्डरची सोसायटीतल्या रहिवाशांना मारहाण, अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

Pune Crime : सोमवार पेठेतील शाळेतून दोन मुली बेपत्ता; समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT