Summer Health esakal
लाइफस्टाइल

Summer Health : कडाक्याच्या उन्हातून आल्यावर किती वेळाने पाणी प्यावे? तज्ज्ञ सांगतात की...

सकाळ डिजिटल टीम

Summer Health :  

कडक उन्हाळ्याच्या झळा अजूनही काही कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. क्लायमेट चेंजचा अफाट परिणाम वातावरणावर झाला आहे. त्यामुळे आपण वर्षातून दोनवेळा कडाक्याच्या उन्हाचा सामना करत आहोत. ऑक्टोबर आणि एप्रिल-मे या दोन्ही वेळा सुर्य देव आग ओकत असतो.

उन्हाळ्यात उष्माघाताचा त्रास होऊ नये, यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. उन्हात प्रवास करणार असाल तर सोबत पाण्याची बाटली असते. पण, कडाक्याच्या उन्हातून घरात किंवा ऑफीसमध्ये पोहोचल्यानंतर आपण थंड पाण्याची बाटली तोंडाला लावतो. फॅन, एसीमध्ये जातो. पण, असे प्रवासातून गेल्यानंतर लगेचच पाणी न पिण्यास सांगितले जाते. (Health Tips For Summer)

डॉक्टर म्हणतात की, उन्हाळ्यात अतिथंड पाणी पिणेही आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. उन्हाळ्यात बाहेरून आल्यानंतर थंड पाणी प्यायल्यास ते तुमच्या आरोग्याला गंभीर हानी पोहोचवू शकते आणि तुमच्या मेंदूवरही परिणाम होऊ शकतो.

जर तुम्ही उन्हातून घरात आला असाल तर लगेच पाणी पिऊ नये. तुम्ही ५-१० मिनिटे शांत बसून मग पाणी प्यावे. पण हे पाणी अतिथंड असू नये.  जास्त थंड पाणी प्यायल्याने उष्माघात, अपचन, पोटदुखी, उलट्या, चक्कर येणे यासारख्या समस्याही उद्भवू शकतात.

आपण सूर्यप्रकाशातून बाहेर आल्यानंतर फक्त साधं पाणी प्यावे. जेणेकरून आपल्या शरीराच्या तापमानात अचानक बदल होणार नाही. अति उष्णतेतून सामान्य तापमानात परत आल्यानंतर अचानक थंड पाणी प्यायल्यास सर्दी आणि ताप देखील होऊ शकतो.

दिवसभरात किती पाणी प्यावे?

डॉक्टर, तज्ज्ञ सांगतात की, लोक सहसा विचारतात की आपण एका दिवसात किती पाणी प्यावे? काही 4 लिटर पाणी पिण्याचा सल्ला देतात, तर काही 5 लिटर पिण्याचा सल्ला देतात. पण उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी प्यावे. याशिवाय अशा पदार्थांचे सेवन करावे ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असेल आणि सकस आहार घ्यावा.

उन्हाळ्यात संसर्ग होण्याचा धोकाही खूप वाढतो, अशा स्थितीत पाण्याची पातळी संतुलित ठेवावी. घाणेरडे पाणी पिऊ नये, घरातील स्वच्छ पाणी प्यावे आणि बाहेरील लिंबू, शिकंजी, उसाचा रस टाळावा, कारण यामुळे सुद्धा होऊ शकते.

अपचन आणि पोटाशी संबंधित तक्रारी. स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे खूप महत्वाचे आहे, परंतु हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे की जास्त पाणी पिणे देखील आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT