Travelling Tips esakal
लाइफस्टाइल

Travelling Tips : पावसाळ्यात बाहेरच खाऊन आजारांना आमंत्रण कशाला द्यायचं? हे पदार्थ तुमच्या प्रवासातील भुकेला करतील छुमंतर

सकाळ डिजिटल टीम

Travelling Tips :

पावसाळ्यात प्रवास करताना नेहमीच खाण्याच्या पदार्थांची जास्त काळजी घ्यावी लागते. कारण हे खाण्याचे पदार्थ जास्त काळ ताजे राहू शकत नाहीत. आपण बिंधास्तपणे बाहेरचे जेवण घेऊ शकत नाही. कारण पावसाळ्यात साथीचे आजार आणि दूषित पाणी दूषित अन्नामुळे होणारे आजार अधिक वाढलेले असतात. त्यामुळे प्रवासात बाहेरील पदार्थ खाताना जास्त काळजी घ्यावी लागते.

जर तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल. कारण रेल्वेतील जेवण, दूषित पाणी यामुळे व्हायरल आजार होतात. काही वेळा रेल्वेतील पदार्थ खाल्ल्याने पोट बिघडणे, पचन नीट न होणे, पोट फुगणे, असे आजार सुद्धा होतात. त्यामुळे लोक ट्रीपला किंवा प्रवासाला निघताना घरचे पदार्थ घेऊन जातात. प्रवासात जर लहान मुलं सोबत असतील तर नक्कीच जेवण सोबत न्यावे लागते.

मुलांना थोड्या वेळाने सतत भूक लागत असते. प्रवासात बिस्किट, चिप्स, चॉकलेट्स अशा गोष्टी खाण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे मुलांसाठी प्रवासात काही पदार्थ तुम्ही नेले तर ते आजारापासून दूर राहतील. आणि प्रवासातही त्यांना प्रवासाची मजा घेता येईल.

कारल्याची भाजी

जर तुम्ही स्वतःसाठी काही घेणार असाल तर, कारले तुमचे चांगली मदत करू शकेल. कारण, कारल्याची भाजी अनेक दिवस ताजी राहू शकते. जी खाल्ल्याने आपल्याला अनेक पोषक तत्व मिळतात.

आणि मधुमेह रुग्णांसाठी तर कारल्याची भाजी उत्तम आहे. त्यामुळे तुम्ही प्रवासात कारल्याची भाजी आणि चपाती किंवा भाकरी घेऊ शकता. ज्यामुळे बाहेरील अन्न खाऊन तुम्हाला त्रास होणार नाही.

हेल्दी सँडविच घेऊन जा

तुम्ही प्रवासात काकडी, टोमॅटो, पनीर अशा गोष्टी नेऊ शकता. तसेच बॅगमध्ये ताज्या ब्रेडचे पॅकेट ही ठेवू शकता. त्यामुळे प्रवासात तुम्ही कधीही सँडविच बनवून खाऊ शकता. मुलांनाही सँडविच हा एक आरोग्यदायी पर्याय ठरेल.

कडधान्य

तुम्ही पावसात स्प्राऊट्स म्हणजे कडधान्यही नेऊ शकता. कडधान्य तुम्ही कच्चे खाऊ शकता. त्यामुळे त्यातून तुम्हाला अनेक पोषक तत्व मिळतील. जर तुम्हालाही कच्चे खायचं नसतील तर वेगवेगळ्या पदार्थ कडधान्यांची भेळ करून त्याच्यावर टोमॅटो कांदा कोथिंबीर आणि काही मसाले शिंपडून तुम्ही भेळ बनवू शकता.

पिठलं भाकरी

पूर्वीच्या काळातील लोक चपाती भाजीचे जेवण घ्यायचे. तर तुम्हीही असाच काही विचार करत असाल तर चपात्या आणि मुगडाळीच फोडणीचं पिठलं ज्याला फोडीव झुणका असेही म्हणतात. हा सोबत नेऊ शकता हे अनेक दिवस ताजे राहू शकते.

फळ आणि सॅलेड

तुम्हाला यापैकी काही न्यायचं नसेल तर तुम्ही फळ आणि सॅलड्स नेऊ शकता. कारण फळ तुम्ही कधीही कापून खाऊ शकता. ज्यामुळे ती ताजी असतील. प्रवासातही तुम्हाला कुठे फळ दिसली तर ती तुम्ही विकत घेऊन खाऊ शकता. पण प्रवासात शक्यतो बाहेरील अन्न खाणे टाळा कारण पावसाळ्यात याचे अनेक वाईट परिणाम होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT