Vat Purnima 2024: आज वटपौर्णिमा. यमाला हरवून पती सत्यवानाचे प्राण परत आणणाऱ्या सावित्रीची ही कहाणी. पिढी दर पिढी चालत आली. दरवर्षी वटपौर्णिमेचे हे व्रत विवाहिता करतात आणि पती-पत्नीच्या नात्यातील हा गोडवा कायम ठेवतात. वटवृक्षाखाली हे संभाषण पूर्ण झाले म्हणून वटवृक्ष या व्रताचा केंद्रबिंदू. म्हणून वटवृक्षाचे महत्त्व समजून घ्यावे लागते.
वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडांचे महत्त्व लक्षात घ्यावे लागते. वडाचे झाड मोकळ्या जागेत असावे लागते. वडाच्या झाडाच्या मुळ्या आजूबाजूला पसरतात आणि याचा पसारा मोठा असतो. त्यामुळे हे झाड दुभाजकांमध्ये लावायला नको.
म्हणूनच हे झाड शासकीय कार्यालयांत दिसते. वडाच्या पारंब्या यासुद्धा झाडाला जमिनीशी घट्ट धरून ठेवतात. गंमत म्हणजे जिथे माणसांचा वावर असतो, तिथे झाडाला पारंब्या कमी असतात. आणि जिथे माणसांचा वावर असतो, तिथे मात्र झाडाला भरपूर पारंब्या असतात, अशी माहिती इको ग्रीन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. मीनाक्षी बत्तासे यांनी दिली.
वडाचे झाड बाराही महिने ऑक्सिजन देते. झाडाच्या पानाचा आकार खूप मोठा असतो. आपल्या शहरात १०० वर्षे आयुष्यमान असलेली जवळपास १५ झाडे आहेत. त्यामुळे वडाचे झाड लावायला हवे, असे एज्युकेशनल अकादमीचे अध्यक्ष डॉ. दिलीप यार्दी यांनी सांगितले.
पूर्वी स्त्रियांना निवांतपणा मिळत नसे. व्रत-वैकल्यांच्या निमित्ताने तिला हक्काचा वेळ मिळायचा. वडाच्या झाडाचा पसारा मोठा. मग हे झाड गावापासून जरा दूर असायचे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिला वटवृक्षाची पूजा करण्यासाठी एकत्र येत. पूजा झाली की तिथेच सूरपारंब्या खेळायच्या. एकमेकींची ओटी भरताना संवाद साधायच्या. त्यामुळे महिलांना हे व्रत सुखदायक वाटायचे. धावपळीच्या जीवनात आजची गृहिणी, नोकरदार स्त्रिया व्रत पूर्ण करतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.