वायनाड : केरळमध्ये सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने (एसडीपीआय) लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. या पाठिंब्याबाबत काँग्रेसचे वायनाडमधील उमेदवार राहुल गांधी यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. ‘
एसडीपीआय’ हा पक्ष म्हणजे बंदी असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेची राजकीय शाखा आहे. काँग्रेसवर टीका करताना वायनाड येथील भाजपचे उमेदवार के. सुरेंद्रन म्हणाले,‘‘पीएफआय संघटना देशाचे तुकडे करण्याचे प्रयत्न करत आहे.
ही संघटना आणि ‘एसडीपीआय’ हे जाहीरपणे हिंदू आणि ख्रिस्ती समुदायातील नागरिकांची हत्या करण्याची, मंदिरे-चर्च नष्ट करण्याची आणि भाजप नेत्यांवर हल्ले करण्याची चिथावणी देत असतात. याच ‘एसडीपीआय’ने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. ‘पीएफआय’वर का बंदी घातली आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला असून काँग्रेसनेही मिळेल तिथून पाठिंबा स्वीकारू, असे म्हटले आहे. हा प्रकार धक्कादायक असून राहुल गांधी यांनीच आता पक्षाची भूमिका स्पष्ट करावी.’’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.