Mumbai News : भाजप-शिंदे गट-अजित पवार गटाच्या महायुतीने महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागा जिंकणे आवश्यक असल्याने काही चेहरे बदलायचे का?, याबद्दल विचार सुरू असल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ४० च्या वर आमदारांना फोडून शिवसेनेतून बाहेर पडले आहेत.
त्यांच्या या लोकप्रियतेत तसेच नेतृत्वात लोकसभेच्या निकालांनी भर घालावी. त्यासाठी काही बाबींचा त्यांनी सारासार विचार करून निर्णय बदलावेत असे भाजपचे म्हणणे आहे. शिवसेना शिंदे गटाला योग्य त्या जागा देण्यास विरोध नाही, फक्त उमेदवाराच्या जिंकण्याची शाश्वती आहे का हे लक्षात घेणे आवश्यक आहे हेही लक्षात घेणे गरजेचे असल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे.
या पूर्वी घोषित झालेले काही उमेदवार खरोखरच योग्य आहेत का, याचा विचार करण्याचे सुचवण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये या संदर्भात चर्चा झाल्याचे समजते.
भाजप सातारा जागेबद्दल आग्रही आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण यांच्यापेक्षा नारायण राणे जिंकण्याची शक्यता जास्त आहे. ठाण्यासाठी आग्रह धरताना नवी मुंबई परिसरातील मते मिळतील का याचाही अंदाज घ्या असे सांगत पालघरसाठी उमेदवार भाजपने दिला होता याकडेही लक्ष वेधण्यात आल्याचे समजते. नाशिक आणि धाराशिव या दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. या पाचही जागांबाबत शिंदे गट आग्रही आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.