Narendra Modi sakal
लोकसभा २०२४

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

सकाळ वृत्तसेवा

लातूर/धाराशिव/माळशिरस : ‘‘विरोधकांनी सिंचन योजना रखडवून महाराष्ट्राला धोका दिला. शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून पाठवलेला पैसा ‘पंजा’ गावागावांत लुटत होता. काँग्रेसपासून सावध राहा,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी माळशिरस येथे केले. उस्मानाबाद (धाराशिव) आणि लातूर येथेही त्यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. लातूर आत्मनिर्भर भारता`चे हब बनत चालले आहे, असे कौतुक करीत आघाडी सरकारने रोखलेल्या मराठवाडा वॉटरग्रीड, जलयुक्त शिवार या योजनांना राज्य सरकार गती देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

महायुतीच्या पाठीशी उभे राहा

माळशिरस : ‘‘आपल्या मुलाबाळांसाठी कष्टाने कमावून बचत केलेल्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा आहे. आपल्या मेहनतीचा हिस्सा लुटण्याचा विचार करणारे धोकादायक आहेत.त्यासाठी काँग्रेसपासून सावध राहा. मजबूत भारत व मजबूत सरकारसाठी महायुतीच्या पाठीशी उभे राहा,’’ असे आवाहन मोदी यांनी केले. माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरस येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सिंचन, सहकार, शेती क्षेत्राकडे केलेल्या दुर्लक्षाप्रश्नी त्यांनी विरोधकांवर टीका केली.

हा केवळ ट्रेलर आहे

धाराशिव : आमच्या सरकारने विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी केली असून, हा केवळ ट्रेलर आहे. ही निवडणूक शक्तिशाली, विकसित भारतासाठी असून साथ देण्याचे आवाहन मोदी यांनी केले. विश्वासघात हीच काँग्रेसची ओळख असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला. उस्मानाबाद मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

घरात घुसून मारण्याची भारतात ताकद

लातूर : ‘‘शैक्षणिक क्षेत्रात लातूरचे नाव गाजवणाऱ्या लातूरकरांना नमस्कार. आई तुळजाभवानी, सिद्धेश्वर महाराजांना श्रद्धापूर्वक नमस्कार,’’ असे म्हणत मोदींनी मराठीतून भाषणाची सुरवात केली. लोकसभेच्या लातूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ आज झालेल्या सभेत ते बोलत होते.काँग्रेस, ‘इंडिया’ आघाडीवर त्यांनी टीकास्त्र सोडले. मी ‘एक भारत’ची चर्चा करीत असताना काँग्रेस मात्र भारताकडे विभागून पाहत आहे. दरवर्षी एक पंतप्रधान देण्याचा त्यांचा मनसुबा आहे.

काँग्रेसने देशाला लुटण्याची योजना तयार केली आहे, असे ते म्हणाले. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांना उद्देशून बोलताना मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या काळात मुंबई, दिल्लीत बॉम्बस्फोट व्हायचे. त्यावेळी घटनेची केवळ फाइल पाठवली जात असे. पुढे कारवाई काहीच होत नसे. मोदी आल्यानंतर मात्र घरात घुसून मारतो हे दाखवून दिले. ‘मिशन एलओसी’, पाकिस्तानमधील ‘सर्जिकल स्ट्राईक’ ही त्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे आज देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत नाही. आज घरात घुसून मारण्याची ताकद आता भारतात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT