नवी दिल्ली : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कारभार आवडत नसल्याचा कौल जनतेने या निवडणुकीतून दिला आहे,’’ असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज व्यक्त केले. निकालानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी काँग्रेस व इंडिया आघाडीला साथ दिल्याबद्दल जनता आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.
राहुल गांधी म्हणाले, ‘‘ही लढाई केवळ भाजप या राजकीय पक्षाच्या विरोधात नव्हती, तर भाजपसोबत सीबीआय, ईडी, न्यायपालिका या संस्थांच्या रक्षणासाठी होती. मोदी व शहांनी या संस्थांवर कब्जा केला होता.
त्यांना धमकाविले व घाबरविले होते. ही लढाई राज्यघटना वाचविण्याची होता. अनेक मुख्यमंत्र्यांना बेकायदा तुरुंगात टाकले गेले. राज्यघटना वाचविण्यात देशातील सर्वांत गरीब, दलित, वंचित व आदिवासींनी जोरदार समर्थन देत त्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे.’’
सरकार स्थापन करण्याच्या संदर्भात काँग्रेसने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसून इंडिया आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी वायनाड (केरळ) व रायबरेली (उत्तर प्रदेश) या दोन्ही मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. या दोन्हींपैकी कोणता लोकसभा मतदारसंघ कायम ठेवायचा, याबद्दल अद्यापही आपण निर्णय घेतलेला नाही. काही दिवसांनी या संदर्भात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभेचा निकाल लागल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर मोठ्या प्रमाणावर गडगडल्याच्या घटनेबाबत राहुल म्हणाले, ‘‘मोदी व अदानी यांच्यामध्ये संबंध आहे. निवडणुकीचे निकाल लागल्याबरोबर शेअर बाजारात उलथापालट झाली आहे. सर्वसामान्य लोकांनासुद्धा माहिती आहे की, मोदी व अदानीमध्ये व्यावसायिक संबंध आहेत.’’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.