Ramesh Jadhav Kalyan Loksabha 
लोकसभा २०२४

Kalyan Lok Sabha: कल्याणमधून ठाकरे उमेदवार बदलणार? आणखी एक अर्ज दाखल झाल्यानं चर्चेला उधाण

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून यापूर्वीच वैशाली दरेकर यांना उमेदारी जाहीर झाली आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्जही भरला. पण आता ठाकरे गटाचे नेते माजी महापौर रमेश जाधव यांनीही अर्ज भरल्यानं या मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. त्यामुळं ठाकरेंकडून उमेदवार बदलणार असल्याची चर्चाही सुरु झाली आहे. (will Uddhav Thackeray change his candidate from Kalyan because Ramesh Jadhav file new application)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील केडीएमसीचे माजी महापौर रमेश जाधव यांनी शुक्रवारी कल्याण लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, अंतिम टप्प्यात जाधव यांनी आपला अर्ज दाखल केला. दरम्यान, पक्षाकडून जाधव यांना देखील उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितल्यानं ठाकरे गटाचा कौल नेमका कोणाकडे आहे? याची चर्चा आता रंगली आहे. (Latest Maharashtra News)

सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून आता नक्की कोण उमेदवारी अर्ज मागे घेतो? तसेच पक्ष दोघांपैकी कोणाला उमेदवारी जाहीर करतात हे पहावं लागणार आहे. पण वैशाली दरेकर या अर्ज मागे घेतील अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.

नाराजीचा फटका नको म्हणून खबरदारी

महायुतीचा उमेदवार ठरण्याअगोदरच महाविकास आघाडीनं आपला उमेदवार जाहीर करत वैशाली दरेकर यांचं नाव जाहीर केलं होतं. दरेकर यांना उमेदवारी दिल्यानं मविआतील वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात काहीशी नाराजी आहे. त्यातच ठाकरे गटाचे डोंबिवलीतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यामुळं ही नाराजी उघड उघड दिसून आली. (Marathi Tajya Batmya)

विधानसभेचं गणित

माझे महापौर जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरण्यामागं विधानसभेचं गणित असल्याचं देखील बोललं जात आहे. ऐनवेळेला राजकीय समीकरणं फिरून पुढे अडचण होऊ नये म्हणून जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं बोललं जात आहे. (Latest Marathi News)

दरेकर, जाधव यांचं म्हणणं काय?

दरम्यान, रमेश जाधव यांनी सांगितलं की, "उद्धव ठाकरे यांनी सकाळी फोनवर संपर्क साधून आम्हाला उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितलं. त्यानुसार शिवसेना पक्ष मशाल यावर आपण उमेदवारी अर्ज भरला आहे. दोन्ही उमेदवारांवर पक्षाचा विश्वास असून यातून एक उमेदवार निवडला जाईल. उमेदवाराच्या अर्जात एखादी त्रुटी राहिल्यास कोणती अडचण येऊ नये म्हणून हा फॉर्म आम्ही भरला आहे.

तर वैशाली दरेकर यांनी यावर भाष्य करताना म्हटलं की, "पक्ष त्यांचे उमेदवार ठरवत असतात. पक्ष आदेश देऊ शकतो, त्याप्रमाणं त्यांनी फॉर्म भरला. पक्षाचा आदेश हेच आमचं काम आहे. तसेच तुम्ही फॉर्म भरून ठेवा असा आदेश पक्ष देऊ शकतो, ही पद्धत आहे. दोन फॉर्म भरून ठेवले जातात. त्याप्रमाणं पक्षानं हा आदेश दिलेला आहे. जर यात काही वेगळंच कारण असतं तर भव्य रॅली काढत माझा उमेदवारी अर्ज भरला नसता. पक्षाच्या काही रणनिती असतात, सर्वच उघड करता येत नाहीत. त्यांनी फॉर्म भरला यात काही वावग नाही. उमेदवार चेंज होणार नाही, जस्ट वेट अँड वॉच"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT