Solapur ZP Sakal
महाराष्ट्र बातम्या

१०१९ ग्रामपंचायती अन्‌ ६६० ग्रामसेवक! बार्शी, अक्कलकोट, करमाळ्यात सर्वाधिक रिक्तपदे; झेडपी करणार ६४९ पदांची भरती

सोलापूर जिल्ह्यातील एक हजार १९ ग्रामपंचायतींचा कारभार सध्या केवळ ६६० ग्रामसेवकांवर सुरु असल्याची विदारक वस्तुस्थिती समोर आली आहे. शासनाकडून भरती न झाल्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : प्रत्येक गावातील लोकांच्या दैनंदिन समस्या सुटाव्यात, गावच्या विकासाची कामे वेळेत व्हावीत म्हणून ग्रामपंचायत तेथे ग्रामसेवक, आवश्यकच आहे. पण, सोलापूर जिल्ह्यातील एक हजार १९ ग्रामपंचायतींचा कारभार सध्या केवळ ६६० ग्रामसेवकांवर सुरु असल्याची विदारक वस्तुस्थिती समोर आली आहे. शासनाकडून भरती न झाल्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी, करमाळा या तालुक्यांमध्येच ग्रामसेवकांची सर्वाधिक ७२ पदे रिक्त आहेत. त्यानुसार अक्कलकोट १९, बार्शी २६, करमाळा १७, कुर्डुवाडी १०, सांगोला आठ, उत्तर सोलापूर दोन, पंढरपूर तीन, दक्षिण सोलापूर एक, अशी ग्रामसेवकांची एकूण ८६ पदे सध्या रिक्त आहेत. रिक्त पदांची भरती मागील सहा-सात वर्षांत झालेली नाही. त्यामुळे ‘एक ग्रामसेवक अन् त्यांच्याकडे दोन-तीन ग्रामपंचायतींचा कारभार’ अशी वस्तुस्थिती पाहायला मिळत आहे.

जिल्हा परिषदेने त्यांच्याकडील सर्वच विभागांमधील रिक्त पदांची माहिती शासनाला दिली आहे. त्यामुळे नेमक्या काय अडचणी येत आहेत, त्यासंबंधी देखील स्मरणपत्रातून सांगितले. तरीपण, भरती झाली नाही, हे विशेष. गावातील नागरिकांचे प्रश्न सोडवताना ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची असते. शासनाकडून तलाठी भरती जाहीर झाली, आता ग्रामसेवकांची भरती कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जिल्हा परिषद करणार ६४९ पदांची भरती

जिल्हा परिषदेच्या १७ विभागाअंतर्गत जवळपास नऊशे पदे रिक्त आहेत. त्यात ग्रामसेवकांची ८६ तर बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, आरोग्य विभागातील सेवकांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेने पहिल्या टप्प्यात ६४९ पदे भरण्यास मंजुरी मिळावी म्हणून शासनाला प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात तेवढ्या पदांची भरती जाहीर होईल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तरूणांनी त्यादृष्टिने तयारी करावी, असे आवाहनही त्यांनी ‘सकाळ’च्या माध्यमातून केले आहे.

४५ गावांना नाहीत ग्रामविकास अधिकारी

जिल्ह्यातील तीन हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांसाठी स्वतंत्रपणे एक ग्रामविकास अधिकारी देण्याचे शासनाचे धोरण आहे. जिल्ह्यातील २०५ गावांची लोकसंख्या तीन हजारांहून अधिक आहे. त्या गावांचा कारभार सध्या १६० ग्रामविकास अधिकाऱ्यांवर सुरु आहे. बार्शी आणि माळशिरस तालुक्यात सर्वाधिक २३ पदे रिक्त आहेत. त्या ४५ गावांना पूर्णवेळ अधिकाऱ्यांची गरज आहे. त्यांची भरती कधी होणार, याकडे त्या गावांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT