solapur city maharashtra
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर शहरातील 12 पोलिस चौक्या कुलूपबंद! दरमहा 2 चौक्या सुरू करण्याचे पोलिसांचे नियोजन; प्रत्येक चौकीत 3 पोलिस अंमलदार; अडचणीतील लोकांना ‘११२’चा आधार

शहराची लोकसंख्या १२ लाखांवर पोचली, पण पोलिस मनुष्यबळ वाढलेले नाही. संपूर्ण शहरात सात पोलिस ठाणी असून २३ पोलिस चौक्या देखील आहेत. पण, मनुष्यबळाअभावी १२ पोलिस चौक्यांना अद्याप कुलूपच आहे. पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी आता स्थानिक गरज पाहून त्या चौक्या सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : शहराची लोकसंख्या १२ लाखांवर पोचली आहे, पण शहरातील पोलिसांचे मनुष्यबळ वाढलेले नाही. संपूर्ण शहरात अवघी सात पोलिस ठाणी असून २३ पोलिस चौक्या देखील आहेत. पण, मनुष्यबळाअभावी शहरातील १२ पोलिस चौक्यांना अद्याप कुलूपच आहे. पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी आता स्थानिक गरज पाहून त्या चौक्या सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

सोलापूर शहराचा विस्तार वाढत असून जुळे सोलापूर, बाळे, शिवाजीनगर, बार्शी रोड, तुळजापूर रोड, अक्कलकोट रोड या भागात लोकवस्ती वाढली आहे. मात्र, पोलिस ठाणी आणि चौक्या मर्यादितच आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणच्या नागरिकांना तक्रार देण्यासाठी दूर अंतर पार करून यावे लागते अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आता पोलिस चौक्या सुरू ठेवून त्याठिकाणी दोन-तीन पोलिस कर्मचारी बसविले जाणार आहेत.

नवीवेस पोलिस चौकी खूपच जुनी असून एकेकाळी मोठमोठ्या मिरवणुका असताना पोलिस आयुक्त त्याठिकाणी बसायचे. पण, सध्या ती चौकी कुलूपबंद आहे. रेल्वे स्थानक परिसरात देखील चौकीची गरज आहे, पण त्याठिकाणी सध्या चौकीच नाही. बाळे येथील पोलिस चौकी गरजेची असून शिवाजीनगर, बार्शी रोड अशा भागातील लोकांसाठी ती सोयीची आहे. अशा गरजेच्या चौक्या आता कधीपर्यंत सुरू होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिस चौक्या बंद असल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्याचीही स्थिती आहे.

दरमहा दोन चौक्या सुरू करण्याचे नियोजन

सोलापूर शहरात २३ पोलिस चौक्या आहेत, त्यातील ११ चौक्या सुरू आहेत. आता उर्वरित १२ पोलिस चौक्यात टप्प्याटप्याने सुरू करण्याचे नियोजन आहे. स्थानिक गरज पाहून दरमहा दोन पोलिस चौक्या सुरू होतील, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

- विजय कबाडे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर

शहरातील पोलिसांची स्थिती

  • एकूण पोलिस ठाणे

  • पोलिस चौक्या

  • २३

  • सुरू पोलिस चौक्या

  • ११

  • बंद पोलिस चौक्या

  • १२

अडचणीतील लोकांना ‘डायल ११२’चा आधार

पोलिस ठाण्यांपर्यंत येण्यास अडचण आहे, पण पोलिसांची मदत पाहिजे, अशावेळी नागरिकांना ‘डायल ११२’चा मोठा आधार आहे. दरवर्षी हजारो लोक ११२ वर संपर्क साधतात. अवघ्या पाच मिनिटात त्या गरजूंच्या मदतीसाठी पोलिस घटनास्थळी धाव घेतात. शहरातील पोलिस ठाण्यांचे नंबर ज्यावेळी लागत नाहीत, त्यावेळी लोक ११२ या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधून मदतीची मागणी करतात आणि त्यांना पोलिसांकडून मदत देखील मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT