Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: 'पवारांचे विचार नथुरामच्या पायाची धूळही नाहीत...', सदावर्तेंचं वादग्रस्त विधान!

अंकिता खाणे (Ankita Khane)

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त वकतव्य करत टीका केली आहे. त्याचबरोबर सदावर्तेंनी यांनी महात्मा गांधींच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या नथुराम गोडसेचं समर्थनही केलं आहे. यवतमाळ येथे एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये नथूराम गोडसेचा उल्लेख करत गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

"शरद पवारांचे विचार हे नथूराम गोडसेच्या पायाच्या धुळी इतकेही नाहीत. गांधीजींचे विचार आता शिल्लक राहिलेले नाहीत", असं वादग्रस्त वक्तव्य गुणरत्न सदावर्ते यांनी केलं आहे.

गुणरत्न सदावर्ते काय म्हणालेत?

"नथुरामजींची अखंड भारताची भूमिका प्रत्येक हिंदुस्तानी काळजामध्ये ठेवून आहे. कुणाला सुद्धा भारताचे तुकडे पसंत नाहीत. आज सुद्धा तोच विचार आहे. गांधींचा विचार आता काही शिल्लक राहिलेला नाही असं मला वाटतं. अखंड भारताचाच विचार शिल्लक आहे."

"पाकिस्तान देण्याचा विचार शिल्लक नाहीय. म्हणून त्यांचा विचार काँग्रेसी कधीही संपवू शकत नाहीत. असे थातूर मातूर फुटक्या विचारांचे तर कधीच संपवू शकत नाहीत. त्यांची लायकीच नाही. शरद पवारांचा विचार सुद्धा नथुरामजींच्या पायाच्या धुळीइतका सुद्धा नाही असं माझं स्पष्ट मत आहे," असं सदावर्ते यवतमाळमध्ये बोलताना म्हणाले आहेत.

तर पुढे बोलताना सदावर्ते म्हणाले की, नथुराम गोडसेच्या विचारातील अखंड भारताचा विचार आजही भारतीयांच्या मनात असल्याचं ते म्हणालेत. आज महात्मा गांधींचे विचार म्हणून जे सांगितले जातात ते विचार आता शिल्लक राहिलेले नाहीत असं माझं वैयक्तिक मत आहे असंही सदावर्ते म्हणाले आहे. तर काँग्रेस कधीच नथुरामच्या विचारांना संपवू शकत नाही असंही पुढे सदावर्ते म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: मुंबईहून पुण्याला आता दीड तासांत जाता येणार! गडकरींनी दिली नव्या हायवेची माहिती

Tirupati Laddu: तिरुपती प्रसाद प्रकरणावरून केंद्राने मागविले उत्तर; दोषींवर होणार कठोर कारवाई

प्रो कबड्डी सीझन २ विजेता U Mumba संघ ११ व्या हंगामासाठी सज्ज; प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

IND vs BAN: Virat Kohli ची विकेट वादग्रस्त ठरली, पण पठ्ठ्याने १७ धावा करूनही मोठा पराक्रम केला

Nitin Gadkari : सरकारने कंपन्या चालवल्यामुळे मुलभूत प्रश्नच सुटले नाहीत; पुण्यात नितीन गडकरींचं विधान

SCROLL FOR NEXT