Ajit Pawar And Devendra Fadnavis Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: स्वबळामागचा प्लॅन! वेगळे लढत अजित पवार राष्ट्रवादीसह करणार भाजपचाही फायदा

आशुतोष मसगौंडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच पुण्यातील कार्यकर्त्यांसमोर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगर पालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीत असले तरी स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी एकीकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून लढणार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढणार, यावरून राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

असे असली तरी अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वतंत्र लढण्याच्या घेतलेल्या निर्णयमुळे याचा राष्ट्रवादीसह भाजपलाही फायदा होणार आहे.

राष्ट्रावादी काँग्रेसला स्वतंत्र लढून काय मिळणार?

गेल्या वर्षी जुलैमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला. त्यानंतर अजित पवार यांच्यासह 40 आमदार आणि अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडली.

यासह स्थानिक पातळीवरील अनेकांनी शरद पवारांना सोडण्याचा निर्णय घेतला. हे सर्वजण बरोबर आल्याने त्यांना संधी देण्याची जबाबदारी अजित पवार यांच्यावर असणार आहे.

आता या सर्वांना न्याय द्यायचा असेल तर जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संधी देणे आवश्यक आहे. मात्र, महायुतीत राहून हे शक्य नसल्याचे लक्षात येताच अजित पवार यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.

पवारांच्या या निर्णयमुळे राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना तसेच स्थानिक नेत्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे. यामुळे त्यांच्याबरोबर आलेले लोकही पक्षात टिकून राहतील. याचसोबत निवडणूक लढवण्याच्या संधीच्या शोधात इतर पक्षातील लोक आल्यास पक्ष वाढण्यास मदत होणार आहे.

भाजप काय साधणार?

राज्यातील महायुती सरकारमध्ये अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी सहभागी झाल्यापासून भाजपचे कार्यकर्ते आणि त्यांच्या पारंपारिक मतदारांमध्ये नाराजी होती. इतकेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीत महायुतीला राष्ट्रवादीमुळे फटका बसला असे आरोप अनेकांनी केले होते. मात्र, अशा परिस्थितीतही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेला महाविकास आघाडी एकत्र लढेल असे सांगितले आहे.

पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत राष्ट्रवादी वेगळी लढल्यास भाजपला आपल्या सर्व कार्यकर्त्यांना संधी देता येणार आहे. सध्या स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत भाजप सर्वात मोठा पक्ष आहे.

2014 मध्ये केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यापासून अनेक स्थानिक नेत्यांनी उड्या मारत भाजप गाठली आहे. अशात आता या सर्वांना तीन पक्ष एकत्र लढल्यास संधी मिळणे अवघड होते. याचबरोबर संधी न मिळाल्यास त्यांना पक्षात टिकवून ठेवणेही अवघड होते. पण अजित पवारांच्या या निर्णयामुळे भाजपला आपली स्थानिक पातळीवरील ताकद कायम राखता येणार आहे.

"स्थानिक पातळीवरील राजकीय गणिते वेगळी"

दरम्यान राष्ट्रवादीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढण्याच्या निर्णयावर राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या विषयावर बोलताना चोरमारे म्हणाले, "युत्या, आघाड्या राज्याच्या पातळीवर एकत्र आणि स्थानिक पातळीवर वेगळे लढणे यामध्ये काही नवे नाही. यापूर्वीही असे अनेकदा पाहायला मिळाले आहे. कारण राज्य पातळीवरील गणिते वेगळी असतात आणि स्थानिक पातळीवरील राजकीय गणिते वेगळी असतात."

या विषयावर पुढे बोलताना चोरमारे म्हणाले, "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढणे हा एक व्यवहार्य निर्णय आहे. असे असले तरी राज्यात सत्तेत असलेल्या आणि स्थानिक पातळीवर वेगळे लढलेल्या पक्षांना निकालानंतर एकत्र येण्याचा पर्यात असतो. त्यामुळेच अजित पवार यांनी हा निर्णय घेतला असावा."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT