Arvind Kejriwal 
महाराष्ट्र बातम्या

Arvind Kejriwal Latest Update: मोदी सरकारचे फक्त एका माणसासाठी काम; मुंबईतील INDIA बैठकीत केजरीवाल काय म्हणाले?

Sandip Kapde

INDIA Alliance Meeting : इंडिया आघाडीच्या बैठकीचा आज आज अखेरचा दिवस आहे. मोदी सरकारविरोधा भारतातील विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. मुंबईतील बैठकीत उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अजेंडा सादर केला. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. बैठकीनंतर सर्व नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

अरविंद केजरीवाल म्हणाले, देशातील मोदी सरकार सर्वात भ्रष्ट सरकार आहे. हे अहंकारी सरकार आहे. सरकार फक्त एका माणसासाठी करत आहे. इंडिया आघाडी 28 पक्षांची आघाडी नाही तर भारतातील 140 कोटी लोकांची आघाडी आहे. लोक एकत्र येत आहेत. मोदी सरकार स्वतंत्र भारतातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे.

परदेशातील वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर बातम्या छापल्या जात आहेत. एका माणसासाठी सरकार काम करत आहेत. एक माणूस देशातील पैसा बाहेर घेऊन जात आहे. यापेक्षा जास्त अहंकारी सरकार झालेलं नाही, असं केजरीवाल म्हणाले.

अरविंद केजरीवाल म्हणाले,  इंडिया आघाडी मोदी सरकारला सत्तेवरुन पायउतार करण्याचे कारण बनेल, असे सर्वांना वाटत आहे. त्यामुळे मोठी शक्ती या आघाडीला तोडण्यासाठी लावली जाईल. आघाडीत भांडण झाल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र मी जबाबदारीने सांगतो. कुणाचे भांडण नाही. आघाडीत कुणीही पदासाठी आले नाहीत तर देश वाचवण्यासाठी आले आहेत. येणाऱ्या काळात भारत एकत्र येणार आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

IND vs BAN 1st Test : Virat Kohli वर रोहित वैतागला; 'तो' एक निर्णय ज्याने अम्पायरही चकित झाले

Latest Marathi News Live Updates: नानासाहेब परुळेकरांच्या जयंतीनिमित्त नितीन गडकरींचं भाषण

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

SCROLL FOR NEXT