Narendra modi and India allince  
महाराष्ट्र बातम्या

अशोक चव्हाण यांनी मांडलं मतांच्या टक्केवारीवरून मोदी सरकारच्या पराभवाचं गणित; म्हणाले...

रवींद्र देशमुख

मुंबई - विरोधीपक्षांनी तयार केलेल्या इंडिया आघाडीची बहुचर्चित बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर या दोन दिवशी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी मोदी सरकारला पराभूत कसं करता येईल, याविषयी विधान केलं.

अशोक चव्हाण म्हणाले की, २०१९ निवडणूक मध्ये आघाडीत आज जे पक्ष आहेत, त्यांना एकूण २३ कोटी ४० लाख मत मिळाले होते. तर भाजपला २२ कोटी मत मिळाली होती. तरी भाजपचा विजय झाला. तेव्हा विरोधक सगळे वेगळे होते. शिवाय भाजपने जिथे सरकारे पाडली ते सोडून ११ मुख्यमंत्री या आघाडीत आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष तोडला तरी आमचे सरकार आले.

अशोक चव्हाण पुढं म्हणाले की, आमचा केवळ विरोध करायचा अजेंडा नाही. विकासाचे काम करण्यासाठी आणि लोकशाहीसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. 'इंडिया' च्या माहोलनंतर महाराष्ट्रात पण आमच्या मित्र पक्षांचे सरकार येईल असा विश्वासही चव्हाण यांनी मांडला.

चव्हाण म्हणाले की, आधी इंडिया आघाडीत २६ पक्ष होते. मात्र आता या आघाडीत २८ पक्ष एकत्र आले असून उद्या आघाडीत २८ पक्ष आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT