Exam  esakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! विद्यापीठाच्या परीक्षांचा बदलणार पॅटर्न; आता विद्यापीठ घेणार 60 गुणांची परीक्षा तर महाविद्यालयाच्या हाती 40 गुण

तात्या लांडगे

सोलापूर : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीत देखील बदल होणार आहे. सध्याच्या प्रचलित परीक्षा पद्धतीनुसार ८० गुणांची परीक्षा विद्यापीठ स्तरावर तर २० गुणांची परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेतली जाते. पण, आता नवीन धोरणानुसार विद्यापीठाकडून ६० गुणांची तर महाविद्यालयांकडून ४० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे.

आगामी शैक्षणिक वर्षापासून (२०२४-२५) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह संलग्नित सर्वच महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणात नवीन धोरण लागू होणार आहे. त्यानुसार पदवी चार वर्षांची तर पदव्युत्तर पदवी एक वर्षाची असणार आहे. तर परीक्षा पॅटर्न देखील बदलणार आहे. विद्यार्थ्यांच्या ४० गुणांची जबाबदारी महाविद्यालयांवर (कॉलेज असेसमेंट) तर ६० गुणांची परीक्षा विद्यापीठ (विद्यापीठ असेसमेंट) घेणार आहे. नवीन धोरणात परीक्षेची सेमिस्टर पद्धत कायम ठेवण्यात आली आहे.

महाविद्यालयांमध्ये जे विषय आहेत, त्यांचे ग्रुप तयार केले जातील. त्यातील आवडीच्या विषयांची निवड विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे. दरम्यान, शैक्षणिक वर्षाची सुरवात होण्यापूर्वी नवीन धोरणाची विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना माहिती व्हावी म्हणून विद्यापीठाच्या पुढाकारातून महाविद्यालय स्तरावर २७ मेपासून कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनातील शंका, संभ्रम व प्रश्न दूर होतील हा हेतू आहे.

वर्षनिहाय विषय निवडीची पद्धत कशी असणार?

नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता पदवीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याला प्रवेश घेताना तीन विषय कंपल्सरी निवडावे लागतील. दुसऱ्या वर्षात गेल्यावर तीनपैकी एक विषय अनिवार्य असेल आणि उर्वरित दोनपैकी एक विषय त्याला ऑप्शनल म्हणून घेता येईल. तिसऱ्या वर्षात गेल्यावर मात्र, त्याला एकच विषय घेऊन पदवीचे शिक्षण पूर्ण करता येईल. पदवीच्या चौथ्या वर्षात त्याला ऑनर्स किंवा रिसर्च यातील एक पर्याय निवडून शिक्षण घ्यावे लागणार आहे. म्हणजेच नवीन धोरणानुसार पदवीच्या पहिल्या वर्षात तीन मेजर (अनिवार्य) विषय, दुसऱ्या वर्षात एक मेजर व एक मायनर (ऑप्शनल तथा दुय्यम विषय) विषय आणि तिसऱ्या वर्षात एकच मेजर विषय विद्यार्थ्यांना घ्यावा लागणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाची येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी २०२४-२५च्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांमध्ये केली जाणार आहे. नवीन धोरणानुसार परीक्षेचा पॅटर्न ६०-४० असा असेल. ६० गुणांची परीक्षा विद्यापीठाकडून घेतली जाईल तर ४० गुणांची परीक्षा महाविद्यालये घेतील.

- डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र- कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT