sharad pawar ajit pawar devendra fadnavis  esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : ''आम्हाला वाटलं श्रेय घ्यायची गरज आहे तर घेऊ'' कांद्यावरुन अजित पवार थेटच बोलले

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः केंद्र सरकारने आज कांदा खरेदीबाबत एक निर्णय घेऊन दोन लाख मेट्रिक टन कांदा २ हजार ४१० रुपये क्विंटलप्रमाणे खरेदी करण्याच्या निर्णय घेतला. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. त्यानंतर गोयल यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, धनंजय मुंडेंच्या भेटीपूर्वीच जपानला गेलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करुन केंद्र सरकारच्या निर्णयाची माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा केंद्रच्या निर्णयाबद्दल माहिती दिली. त्यामुळे कांद्यावरुन श्रेयवाद सुरुय का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.

पत्रकार परिषदेमध्ये श्रेयवादाचा प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे आणि आम्ही दोघेही सरकारचाच भाग आहोत. त्यामुळे त्यात अडचण काय?

पवार पुढे म्हणाले की, कांद्याबाबत श्रेयवादाची लढाई अजिबात सुरु नाही. टीका करणारे शेतकऱ्यांना मदत करण्याच्या भूमिकेत नाहीत. आम्ही श्रेयासाठी हापालेले नाहीत. तरीही आम्हांला वाटलं श्रेय घ्यायची गरज आहे तर घेऊ, अडचण काय आहे?

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी चांद्रयान मोहिमेला शुभेच्छा दिल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी होईल, असं म्हटलं आहे.

शरद पवार काय म्हणाले?

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. पवार म्हणाले की, केंद्र सरकारचा निर्णय आपेक्षा पूर्ण करणारा नाही. केंद्र सरकारने प्रतिक्विंटलसाठी दिलेला २४१० हा भाव कमी आहे. कांद्याला चार हजार रुपये भाव द्यावा, ही मागणी आहे. २ हजार ४०० रुपयांमध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhansabha Election : कल्याण पश्चिमेत मशाल तळपणार... शिंदेंच्या शिवसेनेतून ठाकरेंकडे गेलेल्या नेत्याचा कल्याण पश्चिमेवर दावा

Rohit Sharma ची पळापळ! Mumbai Indians च्या ग्राऊंडवर सरावासाठी गेला होता, पण... Video Viral

Rohit Sharma ने मुंबईच्या रस्त्यावर अचानक गाडी थांबवली अन् चाहतीला केलं 'बर्थ डे विश'; Video Viral

Garba Night: गरबा खेळताना हार्ट अटॅक येऊ शकतो का? वाचा डॉक्टर काय सांगतात

US Jobs: अमेरिकेत 87 लाख लोक एकपेक्षा जास्त नोकऱ्या करत आहेत; देशात नेमकं काय घडतयं?

SCROLL FOR NEXT