Dhananjay Munde|Bajrang Sonawane
Dhananjay Munde|Bajrang Sonawane Esakal
महाराष्ट्र

Dhananjay Munde: बीडवासीयांनो, माझी हात जोडून विनंती... व्हिडिओ पोस्ट करत धनंजय मुंडे असे का म्हणाले?

आशुतोष मसगौंडे

यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा 4 जून रोजी निकाल लागला. यांमध्ये देशात एनडीएला निसटले बहुमत मिळाले. तर, राज्यात महाविकास आघाडीने भाजपसह महायुतीचा सुपडा साफ केला. यामध्ये भाजपच्या अनेक दिंग्गज नेत्यांना पराभव चाखावा लागला.

भाजपच्या पराभूत झालेल्या बड्या नेत्यांमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे यांचाही समावेश आहे. गेल्या विधानसभेला पराभव स्वीकारलेल्या पंकजा यांना लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बजरंग सोनावणे यांनी पराभूत केले आहे.

दरम्यान पंकजा यांच्या पराभवानंतर आणि सोनावणे यांच्या विजयानंतर बीड परिसरात काही चुकीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे तेथिल समाजिक सौहार्द काही प्रमाणात बिघडले आहे.

या सर्वांची दखल घेत बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडवासियांना आवाहन करत हा सर्व प्रकार थांबण्यात यावा अशी विनंती केली आहे.

रीव्हॉल्व्हर प्रकरणी काय म्हणाले मुंडे?

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. मी 1995 पासून लोकसभा निवडणुका पाहत आलो आहे. पण आतापर्यंत अशी निवडणूक कधीच पाहिली नव्हती. आता ही निवडणूक पार पडली आहे. जनतेचा कौल उमेदवारानेही आणि आम्ही मान्य केला आहे. असे असूनही सोशल मीडियाच्या माध्यमातून मतमोजणीदिवशी मी मतदान केंद्रावर रीव्हॉल्व्हर काढली, कोणावर तरी हात उगारला हे अतिशय खोटे आहे.

या अशा अफवा पसरवणे म्हणजे जाती-पातींमध्ये द्वेष पसरवणे आहे. मी पालकमंत्री असल्याने मला मतदान केंद्राच्या परिसरात जाता येत नाही असे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. त्यामुळे मी तिथे नसतानाही मी काही केले असे आरोप होत आहेत, असे मुंडे पुढे म्हणाले.

हात जोडून विनंती...

बीडच्या जनतेला आवाहन करताना धनंजय मुंडे म्हणाले, त्यावेळी मतदान केंद्रावर दोन्हीकडील नेते, कार्यकर्ते होते. त्यामुळे मी असे काही केले असते तर ते लपले नसते. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे की, हे अपप्रचार बंद करा. त्याचबरोबर माझी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे की, हे सर्व आता बंद करा. निवडणूक झाली असून, आता सलोखा राखण्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला पाहिजे.

आमची प्रतिमाही...

सोशल मीडियाबाबत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, काही दिवसांपासून सोशल मीडियावरून समाजिक सालोखा बिघडवला जातोय. इंतकेच नव्हे तर सोशल मीडियावरून आमची प्रतिमाही बिघडवली जात आहे. त्यामुळे माझी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की पुरोगामी महाराष्ट्रात समाजिक सलोखा जपणे आपले कर्तव्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nithin Kamath: सेबीच्या नव्या नियमांमुळे शेअर बाजाराची व्यवस्थाच बदलणार, शून्य ब्रोकरेजचे युग संपणार?

Hathras Stampede: 'या' निष्काळजीपणामुळे हाथरसमध्ये १२१ निष्पाप भाविकांनी गमावला आपला जीव; घटनेला जबाबदार कोण?

WhatsApp AI Feature :व्हॉट्सॲपवर बनवा स्वतःचा हवा तसा फोटो; कंपनी लाँच करतीये नवीन फीचर, मेटा एआयला द्या फक्त 'ही' सूचना

Maharashtra Live News Updates : 'या' फ्लाइटने टीम इंडिया देशात परतणार

Pankaja Munde Wealth : पंकजा मुंडेंचा व्यवसाय शेती, नावावर एकही गाडी नाही; किती कर्ज अन् किती संपत्ती? वाचा डिटेल्स

SCROLL FOR NEXT