Manoj Jarange Patil sakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange Patil: शांतता रॅलीत चार क्विंटल खिचडी व अडीच हजार पाणी बॉटलचे वाटप

नवनाथ इधाटे पाटील

Cha Sambhaji Nagar: छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये आज होणाऱ्या महा शांतता रॅली मध्ये कोणीही उपाशी राहू नये म्हणून उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने तब्बल चार क्विंटल तांदूळ खिचडी व अडीच हजार पाणी बॉटलचे वाटप टीव्ही सेंटर परिसरात छत्रपती संभाजी नगर ते जळगाव महामार्गावरून जाणाऱ्या समाज बांधवांना केले.

छत्रपती संभाजीनगर शहरात सिडको बस स्थानकापासून क्रांती चौक पर्यंत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महा शांतता रॅलीचे आज आयोजन करण्यात आले आहे.

या महा शांतता रॅलीमध्ये कुणीही उपाशी राहू नये याची दखल छत्रपती संभाजीनगर येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतले आहे.

खाण्यापिण्यासाठी रॅलीसाठी येणाऱ्या मराठा समाज बांधवांची भटकंती होऊ नये म्हणून छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावरील टीव्ही सेंटर परिसरात तब्बल चार क्विंटल तांदूळ खिचडी व अडीच हजार पाणी बॉटलचे वाटप उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून करण्यात आले.

त्यामुळे जाणार येणाऱ्या नागरिकांनी येथे थांबून पाणी बॉटल व नाश्ता करून पुढे सिडको बस स्थानकाकडे महा शांतता रॅलीसाठी रवाना झाले.

हजारो समाज बांधवांनी वाहन थांबवले

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या महाशांतता रॅलीसाठी जाणारे हजारो मराठा समाज बांधव टीव्ही सेंटर परिसरात छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने केलेल्या नाश्ता च्या नियोजित जागेवर थांबून नाश्ता केल्यानंतरच पुढे महा रॅलीकडे रवाना झाल्याचे दिसून आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT