Maratha Reservation 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: "आंदोलनाची तीव्रता कमी करायची असेल तर..."; मराठा आरक्षण प्रकरणी रामदास आठवले करणार मध्यस्थी

Sandip Kapde

Maratha Reservation: राज्यात मराठा आरक्षणाची आग भडकत आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता जेवण बंद करून पाणी पिणेही बंद केले आहे. मनोज यांच्या या घोषणेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काल (बुधवार) मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकाने सर्वपक्षीय नेत्यांनी बैठक घेतली. या बैठकीत मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे तसेच सरकारला वेळ द्यावा, यावर सर्व नेत्यांचे एकमत झाले. मात्र मनोज जरांगे त्यांचा भूमिकेवर ठाम आहेत.

दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील यांची विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली. यावर रामदास आठवले म्हणाले," मनोज जरांगे पाटील आग्रह करत असतील, तर दोन दिवसीय विधानसभेचे (मराठा आरक्षणावर) विशेष अधिवेशन बोलावणे अवघड आहे असे मला वाटत नाही. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. मी त्यांना सुचवेन की जर आंदोलनाची तीव्रता कमी करायची असेल तर सरकारने याचा विचार करून विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे.

मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, "बैठकीत सर्व पक्षांनी आपले म्हणणे मांडले आणि प्रत्येकजण मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ होता. महाराष्ट्र सरकारने मार्ग काढला पाहिजे. जरांगे पाटील यांना वाटते की आता नाही तर कधीच नाही पण तसे नाही, आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत. त्यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा."

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या सर्वपक्षीय बैठकीवर काल नाराजी व्यक्त केली. "कोणताही राजकीय नेता आपला नाही. सर्वपक्षीय बैठक झाली मात्र कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे मी पाणी घेणे सोडले आहे. महाराष्ट्र सरकारला माझा सल्ला आहे. तुम्ही कितीही मराठा युवकांवर गुन्हा दाखल करा एक लक्षात ठेवा की मराठ्यांची संख्या सहा कोटी आहे," असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. (Latest Marathi News)

"मी राज्य सरकारला इशारा देत आहे की, तुम्ही आरक्षण देण्यासाठी पावले उचलण्यास जितका वेळ कराल. तेवढी जास्त किंमत मोजावी लागेल. मी मराठा समाजाला वचन देतो की आरक्षणाचा हक्क आपल्याला मिळणार आहे आणि आम्ही जिंकू", असे जरांगे पाटील म्हणाले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT