Vidhan Sabha Election sakal
महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha Election : अधिक जागा जिंकेल, त्या पक्षाचा मुख्यमंत्री ; मविआचा फॉर्म्युला,जागा वाटपावर चर्चा सुरू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या बैठकीला अद्याप सुरुवात झाली नसली तरी कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या आणि मित्र पक्षांना किती जागा सोडायच्या याच्या ढोबळ सूत्रावर प्राथमिक चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी करणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी १०० आणि राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाने ८० जागा लढवाव्यात, या सूत्रावर चर्चा सुरु झाली आहे. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी हा फॅार्म्युला मविआसमोर ठेवला असून त्याआधारे पुढील चर्चा होणार असल्याचे समजते. ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री असेल, असा सोपा मार्ग पवारांनी मविआला दाखवत पुढील वाद टळावेत यासाठी फॉर्म्युला केला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठीची १५ सप्टेंबरच्या दरम्यान आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. मात्र, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांतदेखील पावसाची शक्यता आहे. प्रचारात पावसामुळे अडथळे येण्याची शक्यता लक्षात घेऊन लवकरात लवकर जागा वाटप करण्याकडे मविआचा कल आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधारे तिन्ही पक्षांनी त्रयस्थ संस्थांकडून पाहणी अहवाल तयार करून घेतले आहेत.

बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार जागा वाटप करण्यावर भर असल्याचे काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. तिन्ही पक्षांचे पाहणी अहवाल तयार झाले असून त्यावर यापुढील काळात बैठका सुरु होणार आहेत. मात्र या बैठका सुरु होण्यापूर्वीच शरद पवार यांनी मविआसमोर जागा वाटपाचे सूत्र ठेवून पुढील वाद टळावेत यासाठी पुढाकार घेतल्याचे समजते. २८० जागांवर मविआ तर इतर ८ जागा आघाडीसोबतच्या पक्षांना सोडल्या जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) या दोन्ही पक्षांनी समसमान जागा लढवाव्यात, ज्यामुळे छोटा आणि मोठा भाऊ कोण यासह मुख्यमंत्री कोणाचा हे प्रश्नही निकाली निघतील. ज्या पक्षाच्या जास्त जागा जिंकून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल असाही, याचा अर्थ काढला जात आहे.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘मातोश्री’वर जाऊन त्यांची भेट घेतली. मविआची एकत्रित सभा घेण्याबाबत थोरात यांनी ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्याचे समजते. तसेच जागा वाटपाच्या बैठकांची सुरुवात कधीपासून करावी याबाबतची ढोबळ चर्चा दोघांमध्ये झाल्याचे समजते.

राहुल गांधी रणशिंग फुंकणार?

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ८० वी जयंती येत्या २० ऑगस्टला महाराष्ट्रात साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी विरोधी पक्षनेते राहुल गांधी मुंबईत येणार आहेत. त्याच निमित्ताने विधानसभेच्या निवडणूक प्रचाराची पूर्वतयारी म्हणून मविआची एकत्रित सभा राहुल गांधी यांच्या उपस्थितीत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे समजते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : नरेंद्र मोदी कार्यक्रमस्थळी दाखल

IND vs BAN 1st Test : रोहितकडून Mohammad Siraj वर अन्याय, नेटिझन्स नाराज; पण, बांगलादेशला दिसले 'आकाश' Video

Narendra Modi: विदर्भ बदलतो संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, ढासळलेला बालेकिल्ला नरेंद्र मोदी मजबूत करणार? वर्धा दौरा का आहे स्पेशल?

Crime: तक्रार केलीस तर... धमकी देत १३ वर्षीय मुलावर अत्याचार, ५० वर्षीय नराधमाचं कृत्य, मुलुंडमध्ये खळबळ

Shama Sikander : बालवीर फेम शमा सिकंदरने केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न ; खुलासा करत म्हणाली "हॉस्पिटलमध्ये मला दाखल..."

SCROLL FOR NEXT