Maharashtra MLA Sanjay Gaikwad speaking to the media about the Badlapur incident. esakal
महाराष्ट्र बातम्या

Badlapur School Crime: मुख्यमंत्री शिंदेंनी काय शाळेत पहारा देत बसायचं का? बदलापूर प्रकरणात सत्ताधारी आमदाराचं संतापजनक वक्तव्य

Sandip Kapde

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची पुनः चर्चा रंगली आहे. संजय गायकवाड यांनी बदलापूर येथील दुर्दैवी घटनेवर बोलताना विधान केले की, "मुख्यमंत्री काय आता शाळेत पहारा देणार का?" हे विधान लोकप्रतिनिधींना शोभणारं नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा आमदारांवर कारवाई का करत नाहीत, असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

संजय गायकवाड यांची वाचाळ वक्तव्यं हे नवं नाही. ते यापूर्वी देखील अनेक वेळा वादग्रस्त विधानं करत चर्चेत राहिले आहेत. गायकवाड यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत की, अशा आमदारांवर कारवाई का केली जात नाही?

संजय गायकवाड काय म्हणाले?

कालच्या बदलापूर प्रकरणानंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली. संजय गायकवाड यांनी विरोधकांच्या या टीकेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं, "काल आंदोलन पाहील सर्व पक्ष त्याच्यावर थयथयाट करत होते. ही एक प्रवृत्ती असते त्यांना मुलीचं वय देखील कळत नाही. ते अत्याचार करतात. आता सर्व विरोधक सरकार सरकार करत आहेत. आता मुख्यमंत्री काय महाराष्ट्रातील सर्व शाळेत जाऊन पहारा देणार आहेत का? पोलीस निरीक्षक त्यांच्या घरी जाऊन बसणार आहेत का? की आरोपी फोन करुन सांगतात की ये चल ये मी बलात्कार करत आहे, असं सांगतात का ते?"

या विधानांमुळे संजय गायकवाड यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली आहे. अनेकांनी त्यांच्या वक्तव्याला 'असंवेदनशील' असे म्हटले आहे.

गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सरकारच्या धोरणांवर आणि आमदारांच्या जबाबदारीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. राज्यातील नागरिक आणि विरोधकांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि सरकारकडून ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.

संजय गायकवाड यांची विधानं आणि बदलापूर प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापले आहे. सरकारने या प्रकरणात त्वरित आणि कठोर पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी सर्वत्र होत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून ठोस उपाययोजना केल्या जाण्याची गरज आहे.

बदलापूर प्रकरण काय आहे?-

20 ऑगस्ट रोजी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे दोन शालेय विद्यार्थिनींवर कथित लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन झाले होते, ज्यामुळे 10 तासांहून अधिक वेळ राज्यातील उपनगरीय सेवा प्रभावित झाल्या होत्या. या घटनेनंतर पोलिसांवर हा प्रकरण दुर्लक्षाने हाताळल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पीडित मुलींच्या पालकांना गुन्हा दाखल करण्यासाठी तासंतास प्रतीक्षा करायला लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असून, विरोधकांनी सरकारच्या निष्क्रियतेवर आणि पोलिसांच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshay Shinde Encounter: कोण आहे अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणारा ऑफिसर... प्रदीप शर्मांसोबत केलं आहे काम

Maharashtra Rain Update: मराठवाड्यात पावसाचे जोरदार पुनरागमन, तर कोकणातही मुसळधार

Latest Marathi News Updates : 'मुडा' घोटाळाप्रकरणी आज निकाल शक्य; मुख्यमंत्र्यांच्या बाजूने निकाल येणार की विरोधात?

Idli Pizza Recipe: सकाळी नाश्त्यात चवदार अन् चटपटीत खायचे असेल तर १० मिनिटांत बनवा 'इडली पिझ्झा', जाणून घ्या रेसिपी

On This Day: आठवणीतील पहिला टी२० वर्ल्डकप अन् भारताला जेतेपद, धोनी बनलेला विश्वविजेता कर्णधार

SCROLL FOR NEXT