Nagpur Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

ReNew Company: नागपूरमधील प्रकल्प गुजरातला गेल्याच्या बातमीत किती तथ्य? कंपनीचं स्पष्टीकरण आलं समोर

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमधील एक मोठा प्रकल्प गुजरातला स्थलांतरीत होत असल्याची चर्चा सुरु आहे. माध्यमांनी यासंदर्भात वृत्त दिल्यानं मोठी खळबळ उडाली होती. तसंच महाराष्ट्रातील रोजगार गेल्यावरुन सरकारवर टीकेचा भडीमार सुरु झाला होता. पण आता सरकारनं यावर स्पष्टीकरण दिलं आहे. यासाठी संबंधित कंपनीचं यासंदर्भातील निवदेनच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी समोर आणलं आहे.

कंपनीचं म्हणणं काय?

अठरा हजार कोटींची गुंतवणूक असलेल्या रिन्यूएबल अॅण्ड ग्रीन एनर्जी (ReNew) या नागपूरमधील कंपनीबाबत ही चर्चा सुरु असल्यानं खुद्द या कंपनीनंच एक निवेदन जाहीर करुन स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीनं म्हटलं माध्यमांमध्ये नागपूरस्थित कंपनीची दिशाभूल करणारी बातमी प्रदर्शित झाली होती. त्यानुसार ReNew कंपनीचा नागपूरमधील प्रस्तावीत प्रकल्प गुजरातच्या ढोलेरा इथं स्थलांतरीत होत आहे. ही बातमी केवळ दिशाभूल करणारी नव्हे तर तथ्यहीन असून बेजबाबदारपणानं दिलेलं वृत्त आहे. महाराष्ट्रात आमची कंपनी सौरऊर्जेवरील उत्पदनांसाठी व्हॅल्यु चेन तयार करण्याचं नियोजन करत आहे. अशाच एका गुजरातमधील किंवा इतर कोणत्याही राज्यातील कंपनीत ही गुंतवणूक केली जाणार नाही.

ReNew ही अक्षय्य ऊर्जा निर्मितीत काम करणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. राज्यातील गुंतवणुकीबाबत या कंपनीची बांधिलकी आहे. कंपनीनं महाराष्ट्रात आपला ५५० वॉटचा कॅपॅसिटी बेस तयार केला आहे. तर अतिरिक्त २००० मेगावॉटच्या प्रकल्पाचं सध्या बांधकाम सुरु आहे. २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होईल, यासाठी १५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

त्याचबरोबर राज्य सरकारसोबत काम करताना कंपनी आता ग्रीन हायड्रोजनचा प्रकल्प उभारण्याच्या प्रयत्नात आहे. यातून ३०,००० नोकऱ्या निर्माण होणार आहेत. ReNew कडून सध्या महाराष्ट्र वीज महामंडळाला ५५० मेगावॉट वीज दिली जात आहे. यापूर्वीची आणि येत्या काळातील मिळून कंपनीकडून महाराष्ट्रात सुमारे १ लाख कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

उद्योग मंत्री काय म्हणाले?

महाराष्ट्रात आलेल्या अशा कंपन्यांना खोट्या बातम्या पेरून राज्यातून पळवून लावण्याचं षडयंत्र काही लोकांनी आखलं आहे. काँग्रेसच्या एका नेत्यानं 'लाडकी बहीण योजना' बंद करण्याची घोषणा केली होती, यामुळं निर्माण झालेला वाद झाकण्यासाठी अशी नवीन अफवा सोडण्यात आली आहे.

उद्योग विभागाला वारंवार बदनाम करून राज्यातील गुंतवणूक, उद्योग आणि नोकऱ्या पळवून लावण्याचे ‘रिकामे उद्योग’ काही लोकं करत आहेत. अशा लोकांचे नामोनिशाण राजकीय पटलावर राहणार नाही, यांचा योग्य तो बंदोबस्त राज्यातील जनता जरूर करेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT