शरद पवारांनी बुधवारी पत्रकार परिषद घतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप आणि मोदी सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर गुरुवारी त्यांनी बीडमध्ये सभा घेतली. या सभेत जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते.
आव्हाडांनी यावेळी बोलताना शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. जितेंद्र आव्हाडांनी यावेळी भिडेंचे संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वराबद्दल असलेल्या मताबद्दल वक्त्यव्य केलं.
शरद पवारांनी बीडमध्ये घेतलेल्या सभेत जितेंद्र आव्हाडांनी यांनी संभाजी भिडेंबद्दल वक्तव्य केले. आव्हाड म्हणाले की, "ज्या मनूने मनूस्मृती लिहिली. त्या मनूपेक्षा संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर छोटे आहेत.ज्या तुकारामाच्या आणि ज्ञानेश्वराच्या विचाराने महाराष्ट्र घडवला तो विचार त्याला मान्य नाही. आणि हा भिडे त्यांचा गुरुजी आहे. एकीकडे मोदी म्हणतात हर घर तिरंगा आणि दुसरीकडे भिडे म्हणतो फाड दो तिरंगा."
यापुढे आव्हाड म्हणाले की, "सध्या उलट सुलट राजकाराण महाराष्ट्रात सुरु आहे.या राजकारणाचा ताबा आपण घेतला पाहिजे."
शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीचं चर्चेत असतात. नुसतचं त्यांनी महत्मा गांधी आणि महात्मा फुलेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. याआधी देखील त्यांनी असे की विधानं केले होते, ज्यामुळे महाराष्ट्रात वाद निर्माण झाला होता. त्यांनी मनूस्मृती लिहिणाऱ्या मनूंबद्दल देखील वक्तव्य केलं होतं, ज्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल होती. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.