Alliance with Ajit Pawar:  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Alliance with Ajit Pawar: ‘ऑर्गनायझर’मधील लेखावर अजित पवार गटाने स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, 'अपशय आल्यावर अनेक कारणं...'

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशभरात नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. ४०० पार चा दावा करणाऱ्या एनडीए सरकारला ३०० देखील पार करता आला नाही. लोकसभेत महाराष्ट्रातही महायुतीला या निवडणुकीत मोठा फटका बसल्याचं चित्र आहे. दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला महायुतीत घेण्यावरून आरएसएसच्या मुखपत्रातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता. त्यावर अजित पवार गटाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमुळे (अजित पवार गट) महायुतीला राज्यात मोठा पराभव सोसावा लागला, असं राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित ‘ऑर्गनायझर’मध्ये लिहण्यात आलेल्या लेखाशी राष्ट्रवादी सहमत नसून भाजपचे नेतृत्व देखील या लेखात लिहलेल्या भूमिकेशी सहमत असणार नाही, अशी भूमिका अजित पवार गटाने मांडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले, अपशय आल्यावर अनेक कारणं शोधली जातात. आरोप-प्रत्योराप होतात. आरएसएसशी संबधित ऑर्गनायझरमध्ये आलेल्या लेखाशी भाजपचे नेतृत्व सहमती दाखवणार नाही. पराभवाचा ठपका राष्ट्रवादीवर ठेवता येणार नाही. आमची महायुती ही दिर्घकाळाची आहे. त्यामुळे अजित पवार हे भाजपबरोबर यापुढेही असतील. आता आमचे लक्ष विधानसभा निवडणूक आहे. महायुतीमध्ये कोणताही वाद नाही, मतभेद नाही. झालेल्या चुका विधानसभा निवडणुकीत सुधारल्या जातील. मतभेदाचे निराकरण केले जाईल, असेही पाटील यांनी पुढं बोलताना सांगितलं आहे.

काय म्हटले आहे ऑर्गेनायजरमधून?

लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत 2024 मध्ये महाराष्ट्रात भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सात तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळाली. भाजपने अशा काँग्रेस नेत्याचा पक्षात समावेश केला, ज्याने उघडपणे भगव्या दहशतवादाबद्दल विधान केले होते. त्याने २६/११ ला आरएसएसचे षड्यंत्र म्हटले होते. तसेच आरएसएसला दहशतवादी संघटना म्हटले होते. यामुळे आरएसएस समर्थक दुखावले गेले आहेत. भाजपमध्ये आलेल्या या नेत्यांनी त्यांच्या आधी केलेल्या विधानावर खेद व्यक्त केला नाही किंवा माफी मागितली नाही.

अजितदादांना घेऊन ब्रँड व्हॅल्यू कमी केली

अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने स्वत:ची ब्रँड व्हॅल्यू कमी केली. त्यामुळे महाराष्ट्रात पक्षाला झटका बसला आहे. भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडे बहुमत होते, मग अजित पवार यांना घेण्याची गरज काय होती? असा प्रश्न त्या लेखात उपस्थित करण्यात आला आहे. भाजपने निवडणुकीत सहकार्य करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांशी संपर्कही केला नाही. त्यांनी नि:स्वार्थपणे काम करणाऱ्या जुन्या समर्पित कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT