cm shinde sharad pawar meeting esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : ''मुख्यमंत्र्यांकडे जावून शरद पवार पोहे खाऊन आले का?'' ओबीसी नेत्याचा आरोप, भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

संतोष कानडे

OBC Maratha Reservation : राज्यामध्ये आरक्षणावरुन मराठा-ओबीसी वाद सुरु आहे. त्यातच शरद पवारांनी शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर अधिकृतरित्या कुठलीही माहिती पुढे आलेली नसल्याने ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवारांवर टीकास्र सोडलं आहे.

बीडमध्ये बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, शरद पवार ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडण लावत आहेत. आमच्या एसटीच्या आरक्षणासाठी चार पिढ्या खपल्या आणि आता शरद पवार म्हणत आहेत आमचा पाठिंबा आहे.

पुढे बोलतांना लक्ष्मण हाके म्हणाले की, दोन समाजामध्ये भांडणं लागलेली असताना शरद पवार शांत बसलेले आहेत. त्यांनी पुरोगामी भूमिका घ्यायला पाहिजे होती. त्यांच्या तोंडी नेहमी फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव असते. मात्र जरांगे ज्यावेळी एकीकडे म्हणतात धनगर आणि आम्ही भाऊ-भाऊ आहोत, तीच वेळ साधून बारामतीमध्ये शरद पवार पिवळा रुमाल घालून धनगर समाजाच्या कार्यक्रमात जावून बसतात.

''धनगरांच्या एसटी आंदोलनाला माझा पाठिंबा आहे, असं शरद पवार सांगतात. पण आमच्या चार पिढ्या या आंदोलनासाठी खपल्या असताना त्यावेळी त्यांची काहीच भूमिका नव्हती. त्यामुळे त्यांनी आमच्यामध्ये भांडण लावू नये.'' असं आवाहन हाकेंनी केलं.

मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत बोलताना हाके म्हणाले की, जरांगे पाटलांनी लोकसभेमध्ये भूमिका निभावली आहे. त्यावरून त्यांच्या पाठीमागे कोणीतरी आहे, हे कोणाचे पिल्लू आहे, हे छोट्या बाळाला सुद्धा माहित आहे. असं असताना शरद पवार मूग गिळून का गप्प आहेत?

''शरदचंद्र पवार मुख्यमंत्र्याकडे मीटिंगला जावून फक्त पोहे खाऊन आले का? गावगाडा विस्कळीत होत असताना पवार बोलत का नाहीत? हे न कळलेलं कोड आहे.'' असंही हाके म्हणाले.

मुख्यमंत्री-पवारांच्या भेटीत काय झालं?

शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीचा तपशील जाहीर करण्यात आला नसला तरी या मुद्यावर राजकारण न करता तोडगा काढावा, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडल्याचे समजते. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा सुरू केलेल्या उपोषणामुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे. या बैठकीत शरद पवार यांनी राज्य सरकारने मराठा आणि ओबीसी समाजाच्या उपोषणकर्त्यांना कोणती आश्वासने दिली आहेत? याची माहिती घेतली. तसेच सरकार हा तिढा सोडविण्यासाठी कोणती पावले टाकत आहे? हे देखील त्यांनी जाणून घेतले. या विषयावर राज्य सरकारने मराठा-ओबीसी समाजाला विश्वासात घेऊन सहमतीने निर्णय घ्यावा. सरकार या दोन्ही समाजाच्या हिताचा जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा राहील अशी हमी पवारांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT