Prakash Ambedkar: मनोज जरांगेंची आरक्षणाची मागणी रास्त पण... आंबेडकरांनी भूमिका केली स्पष्ट!  sakal
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar: मनोज जरांगेंची आरक्षणाची मागणी रास्त पण... आंबेडकरांनी भूमिका केली स्पष्ट!

सकाळ वृत्तसेवा

Manoj Jarange Patil latest Update: आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसी समाजाला राजकीय ओळख निर्माण करावी लागेल. त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे आणि भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाद फसविणारा आहे.

राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाला पन्नास टक्के जागांवर उमेदवारी द्यावी, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी (ता. २८) व्यक्त केले.

वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा मराठवाड्यात धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरात दाखल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात ॲड. आंबेडकर यांची जाहीर सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल, अविनाश भोसीकर, रमेश बारसकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बिभीषण खुणे, प्रहारचे डॉ. शहाजी चंदनशिवे, वंचितचे जिल्हाध्यक्ष बी.डी. शिंदे, जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के, जिल्हा सहसचिव मोहन बनसोडे आदी उपस्थित होते.

ॲड. आंबेडकर म्हणाले, सर्वच राजकीय पक्षांनी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आरक्षणावरून सुरू असलेला जरांगे-फडणवीस वाद हा फसविणारा आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर लढणाऱ्या पक्षाला पाठिंबा देऊ; मात्र त्या पक्षाने ओबीसी समाजाला पन्नास टक्के उमेदवारी दिली पाहिजे. ओबीसींचे शंभर आमदार निवडून आणण्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. तानाजी बनसोडे यांनी आभार मानले.

जरांगेंचा मुद्दा रास्त, पण मांडणी चुकली

भूम शहरामधील गोलाई येथे आरक्षण बचाव यात्रा आल्यानंतर ॲड. आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या समाजकारण व राजकारण बाजूला राहून विघटन होण्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहेत. राजकीय भांडणे आता सामाजिक भांडणे होऊ लागली आहेत.

मनोज जरांगे यांनी मराठ्यांना आरक्षण मिळण्याबाबत मुद्दा मांडला असून तो रास्त आहे. पण, मांडणी चुकलेली आहे. मराठ्यांवरती ही परिस्थिती निजामी मराठ्यांनी म्हणजेच श्रीमंत मराठ्यांनी आणली. निजामी मराठ्यांमुळेच आज मराठा समाज विकलांग होत आहे.

सत्तेमध्ये असलेल्या अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे व फडणवीस यांना शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, याचा कायदासुद्धा करता आला नसल्याची टीका त्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: मुंबईहून पुण्याला आता दीड तासांत जाता येणार! गडकरींनी दिली नव्या हायवेची माहिती

Tirupati Laddu: तिरुपती प्रसाद प्रकरणावरून केंद्राने मागविले उत्तर; दोषींवर होणार कठोर कारवाई

प्रो कबड्डी सीझन २ विजेता U Mumba संघ ११ व्या हंगामासाठी सज्ज; प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

IND vs BAN: Virat Kohli ची विकेट वादग्रस्त ठरली, पण पठ्ठ्याने १७ धावा करूनही मोठा पराक्रम केला

Nitin Gadkari : सरकारने कंपन्या चालवल्यामुळे मुलभूत प्रश्नच सुटले नाहीत; पुण्यात नितीन गडकरींचं विधान

SCROLL FOR NEXT