Maharashtra Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Weather Update: विदर्भ-मराठवाड्यात आजही अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा; तुमच्या भागात काय परिस्थिती जाणून घ्या

अंकिता खाणे (Ankita Khane)

Maharashtra Weather Update: राज्यात अवकाळी पावसाचे संकट अद्याप कायम आहे. राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तर आज विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दुसरीकडे मुंबई पुण्यातील तापमानात किंचित घट होऊन रात्री थंडी पडण्याची शक्यता आहे. विदर्भ वगळता राज्यातील इतर भागातील हवामान कोरडे राहणार, अशी माहिती देखील हवामान खात्याने दिली आहे.

तर सध्या विदर्भावर चक्राकार वारे वाहत असून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही मंगळवारी(ता.१९) चंद्रपूर, नागपूर, वर्धा जिल्हात काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस झाला.

काही भागात गारपीट झाल्याने घरांची हानी झाली. नरखेड, काटोल, सावनेर आणि कळमेश्वर तालुक्यातील संत्रा झाडांना फटका बसला. काही झाडे उन्मळून पडल्याचे दिसून आले. भिवापूर, कुही, मौदा, रामटेक, कामठी आणि पारशिवनी तालुक्यातील गहू आणि हरभरा पीक भुईसपाट झाले.

चंद्रपूरः राजुरा, गोंडपिंपरी, कोरपना तालुक्यात काही गावांत अवकाळी पावसासोबत गारपीट झाली. गहू, हरभरा, मिरची पिकाचे नुकसान झाले. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. मंगळवारी सकाळी ऊन होते. मात्र, दुपारी बारा वाजतानंतर वातावरण ढगाळ झाले. एक ते दीड वाजताच्या सुमारास शहरात पावसाला सुरवात झाली. जवळपास एक तास चांगलाच पाऊस बरसला. जिल्ह्यातील राजुरा, गोंडपिंपरी आणि कोरपना तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली.

रब्बी हंगामात जिल्ह्यात उन्हाळी गव्हाचे पीक घेतले जाते. सोबत हरभरा, मिरची आणि भाजीपाल्याचेही पीक घेतल्या जाते. अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने गव्हासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त रब्बी हंगामातील पिकांवरच होती. मात्र, या हंगामावरही पावसाचे संकट कोसळले. मागील महिन्यातही काही ठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे रब्बी पिकांचेही नुकसान झाले. आजही अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वर्धा : शहरासह लगतच्या ग्रामीण भागात तसेच कारंजा तालुका व आर्वी तालुक्यातील वाढोना सर्कलमधील हिवरा तांडा व पाचोड येथे जवळपास पंधरा ते वीस मिनिट पावसासह, गारपीट वादळी वारा झाला. या गारपिटीमुळे चना, गहू, भाजीपाला संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

गोंदिया : सायंकाळी पाचनंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. सोमवारप्रमाणेच मंगळवारीदेखील सकाळपासून कडाक्याचे ऊन तापत असताना अचानक सायंकाळी पाचनंतर वादळीवारा आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. गोरेगाव, आमगाव आणि अर्जुनी मोरगाव तालुक्याला पावसाने झोडपून काढले. विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. अर्जुनी मोरगाव तालुक्यात बोराच्या आकाराच्या गारा पडल्या. या पावसामुळे धान व अन्य पिके धोक्यात आली आहेत.

शेतात पडली वीज

गोंडपिपरी तालुक्यात दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. तालुक्यातील चेकबापूर येथील शेतात वीज कोसळली. ही वीज बंडू तागडे यांच्या शेतात पडली. त्यामुळे शेतात असलेली त्यांची झोपडी जळाली. या झोपडीत शेतीउपयोगी साहित्य होते. हे साहित्य आगीत जळाले. जवळपास तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले. सर्वेक्षण करून नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena: शहाजीबापुंच्या विरोधात ठाकरेंची मोठी खेळी, अजित पवारांच्या बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल! उद्धव ठाकरे, म्हणाले...

IND vs NZ 1st Test : आता आमची सटकली...! Virat Kohli - सर्फराज खान यांची तुफान फटकेबाजी; भारताचा न्यूझीलंडवर पलटवार

पोट धरून हसाल! आईसक्रीम खात IND vs NZ मॅच पाहणाऱ्या फॅनची शास्त्रींनी उडवली खिल्ली ; Funny Video

Latest Maharashtra News Updates : मुंबईतील धार्मिक संस्थांचा पाठिंबा मिळविण्यासाठी भाजपने रणनीति आखली

बैठकीला नाना पटोले उपस्थित असतील तर...; ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बिनसलं? जागांचा वाद विकोपाला

SCROLL FOR NEXT