new education policy  esakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! गुणांची टक्केवारी कितीही असली, तरी विद्यार्थ्यांना प्रत्येक सेमिस्टरला 22 'क्रेडिट'चे बंधन; विद्यार्थ्यांना वर्गात घड्याळी 60 तास बसावेच लागेल

तात्या लांडगे

सोलापूर : पदवी व पदव्युत्तर पदवीसाठी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होत आहे. गुणांच्या टक्केवारीसोबतच विद्यार्थ्यांना क्रेडिट सुद्धा मिळवावे लागणार आहेत. प्रत्येक सेमिस्टरला २२ क्रेडिट घेणे आवश्यक राहील. एका विषयाचे चार क्रेडिट मिळविण्यासाठी विद्यार्थ्याला आता घड्याळी ६० तास वर्गात बसावेच लागणार आहे. वर्गात न बसणे विद्यार्थ्यांच्या अंगलट येणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष १२ जूनपासून सुरू होणार आहे. महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्याला एक क्रेडिट घेण्यासाठी घड्याळी १५ तास वर्गात बसावे लागेल. चार विषयांपैकी एक विषय पूर्ण शिकून चार क्रेडिट मिळवायचे आहेत. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला शनिवार, रविवारची सुटी सोडून तीन महिन्याच्या सेमिस्टर काळात घड्याळी ६० तास त्या विषयाच्या अध्यापनासाठी वर्गात बसावे लागणार आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार परीक्षेचा पॅटर्न आता ६०-४० असा असणार आहे. त्यात ६० गुणांची लेखी परीक्षा विद्यापीठ स्तरावर तर ४० गुणांची परीक्षा महाविद्यालय स्तरावर होणार आहे. विद्यार्थ्याच्या गुणांची टक्केवारी ९०- ९५ टक्के असेल आणि क्रेडिट ठरल्याप्रमाणे न मिळाल्यास त्या विद्यार्थ्याला पदवी प्रमाणपत्र मिळणार नाही. त्यासाठी त्याला तेवढे क्रेडिट घ्यावेच लागणार आहेत. नवीन धोरणानुसार विद्यार्थ्यांचे वर्गातील हजेरी वाढून त्यांची गुणवत्ताही वाढेल, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

क्रेडिट सिस्टिम अशी असणार

शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला प्रत्येक विद्यार्थ्याला ॲकॅडमिक बॅंक क्रेडिट’ (एबीसी) खाते तयार करून घ्यावे लागणार आहे. त्या विद्यार्थ्याने प्रत्येक विषयाला प्रत्येक सेमिस्टरमध्ये मिळविलेले क्रेडिट त्या खात्यात जमा होतील. प्रत्येक सेमिस्टरला २२ क्रेडिटचे बंधन आहे. त्यात एका सेमिस्टरमध्ये एका विषयात किमान चार क्रेडिट (चार विषयांचे १६ क्रेडिट) घ्यावे लागतील. त्याशिवाय फिल्डवर्कसाठी चार क्रेडिट आणि ‘इंडियन नॉलेज सिस्टिम’अंतर्गत (काही अभ्यासक्रमासाठी डेझरटेशन द्यावे लागेल तर काही अभ्यासक्रमाअंतर्गत ‘भारतीय ज्ञान परंपरे’चे दोन विषय निवडून अध्यापन करावे लागणार आहे) दोन क्रेडिट आहेत.

पदवीच्या चार वर्षांत विद्यार्थ्याला घ्यावे लागणार १७६ क्रेडिट

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमात विद्यार्थ्याला गुणांच्या टक्केवारीसोबतच प्रत्येक सेमिस्टरला २२ म्हणजेच दरवर्षी ४४ क्रेडिट घ्यावेच लागतील. पदवीच्या एकूण चार वर्षात त्या विद्यार्थ्याला १७६ क्रेडिट घ्यावे लागणार आहेत. त्याशिवाय त्याची पदवी पूर्ण झाली असे ग्राह्य धरले जाणार नाही.

- प्रा. डॉ. गौतम कांबळे, संचालक, सामाजिकशास्त्र संकुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT