Malegaon Pune: `राज्यसभेच्या खासदार म्हणून सुनेत्रा (काकी) पवार यांचे अभिनंदन करतो. वास्तविक अजितदादांना त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते मंडळीवर विश्वास नसले, अथवा त्यांचे काही लोक आमच्या संपर्कात आहेत याची जाणिव झाल्यानेच त्यांनी कुटुंबातील सदस्याला संधी दिली असवी,` अशी खोचक प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी बारामतीत दिली. राज्यसभेच्या खासदार म्हणून सुनेत्रा पवार बिनविरोध झाल्यानंतर आज बारामतीत पत्रकारांशी आमदार रोहित पवार बोलत होते.
ते पुढे म्हणाले,`अजितदादा बीजेपी बरोबर गेल्याचे बारामती लोकसभेतील जनतेला आवडले नाही म्हणून सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून त्यांचे शिट पराभूत झाले.झाले ते झाले आता सुनेत्राकाकी राज्यसभेच्या खासदार झाल्याने मी त्यांचे बुधवारी अॅडव्हासमध्ये अभिनंदन केले होते.`
खासदार सुनेत्रा पवार यांच्या राज्यमंत्रीपदाचीही चर्चा सुरू आहे, असे विचारले असता रोहित पवार म्हणाले,`` खरेतर अजितदादांनी याआगोदर सांगितले होते, की राज्यमंत्रीपद आम्हाला शोभणारे नाही. असे असताना आगामी काळात सुनेत्राकाकींना राज्यमंत्रीपद जर दिले गेल्यास त्याचे स्पष्टीकरण अजितदादांना द्यावे लागेल. ``
ज्येष्ठनेते छगन भुजबळ यांना राज्यसभेवर जाण्याची इच्छा होती, परंतु त्यांची इच्छा पुर्ण होऊ शकली नाही, यावर पवार म्हणाले,``अजितदादांच्या पक्षात शंभरटक्के अस्वस्थता आहे. ती आता मोठ्या नेत्यांमध्ये आहे, की आमदारांमध्ये आहे हे अजितदादा जाणून आहेत. ती अस्वस्थता विचारात घेता कोणावरच विश्वास ठेवता येणार नसल्यामुळे घरात त्यांनी राज्यसभेची उमेदवारी दिली असे कोठेतरी आता आपल्याला म्हणावे लागेल. `` जयंत पाटील आणि तुमच्यामधील वाद आहे, असे बोलले जाते याकडे पत्रकरांनी लक्ष वेधले असता पवार म्हणाले,`` मी आणि जयंत पाटील यांनी सामान्य लोकांना, कार्य़कर्त्यांना आणि पवारसाहेबांना लोकसभा निवडणूकीतील विजयाचे क्रीडीट दिले. त्यामुळे आम्हा दोघांमध्ये वाद असल्याचे म्हणणे चुकीचे आहे. मीडीयाने वेगळी भूमिका मांडली आणि विरोधकांनी त्याला खतपाणी घातले, ऐवढेच त्यामध्ये आहे. `` शेतकऱ्यांची कर्ज माफी आणि गुरजरातसह परराज्यात केले प्रकल्प पुन्हा महाराष्टात आणण्यासंबंधी आम्ही आगामी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले. बजेट झाल्यानंतर महायुती टिकेल की नाही, याबाबत शंका असल्याचे त्यांनी बोलून दाखिवले.
....
आरक्षणाचा मुद्दा प्रचंड संवेदनशिल आहे. त्यामध्ये सर्व घटकांना न्याय द्यायचा झाल्यास केंद्रामध्ये घटनादुरुस्ती करावी लागेल. त्यासाठी महाविकास आघाडीच्या खासदारांना पार्लमेंटमध्ये पहिल्या दिवसापासून पन्नास टक्क्यांच्या पुढे आरक्षण कसे घेवून जाता येईल त्याबद्दलची चर्चा करावी लागेल. पन्नास टक्यांची मर्य़ादा वढविणारी घटना दुरुस्ती झाल्यास मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आदी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविणे सोपे जाईल. अन्यथा दिलेले आरक्षण कोर्टात टिकणार नाही, असे मत रोहित पवार यांनी मनोज जरांगेच्या उपोषणाबाबत बोलून दाखविल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.