महाराष्ट्र बातम्या

"सरकारची बनवाबनवी, २ लाख टन कांदा खरेदीचा निर्णय चार दिवसांपूर्वीच…"; पवारांचा मोठा खुलासा

सकाळ डिजिटल टीम

Rohit Pawar on Onion Export:सध्या कांदा प्रश्नावरुन राज्यात वादाला तोंड फुटलय. केंद्र सरकारकडून कांद्यातच्या निर्यातीवर ४० टक्के वाढीव शुल्क आकारल्याच्या कारणावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.

निर्यात शुल्क लागू केल्यावर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी नाफेडमार्फत २ लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याची घोषणा केली होती. मात्र, ही घोषणा 'नाफेड'ने तीन दिवसाअगोदरचं केली होती. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

रोहित पवार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन ट्वीट करत, शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये केंद्र सरकारने आधीचं घेतलेल्या निर्णयांचा पाढा वाचून दाखवला.

रोहित पवार म्हणाले की, "‘नाफेड’मार्फत अतिरिक्त २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय झाला होता १७ ऑगस्ट २०२३ रोजी, त्याच दिवशी ४० % निर्यातशुल्क लादण्याचाही निर्णय झाला. दोन्ही निर्णय जाहीर झाले २० ऑगस्ट २०२३ रोजी, त्यानंतर निर्यातशुल्क विरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली परिणामी राज्य सरकार खळबडून जागं झालं."(Latest Marathi News)

त्यानंतर पवार म्हणाले की, "त्यानंतर आज राज्याचे कृषिमंत्री दिल्लीत जाऊन वाणिज्य मंत्र्यांशी बैठक करतात, उपमुख्यमंत्री जपानमधून फोन करतात आणि केंद्र सरकार शेतकरी हितासाठी २ लाख टन कांदा खरेदी करणार असल्याचं ट्विटर वरून घोषितही करतात, त्यावर भर म्हणून राज्याचे मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारच्या २ लाख टन कांदा खरेदी करण्याच्या निर्णयाचं अफाट कौतुक करतात."

ट्वीटमधून रोहित पवारांनी प्रश्न केला की, "जर २ लाख टन अतिरिक्त कांदा खरेदी करण्याचा निर्णय तीन-चार दिवसांपूर्वीच झाला होता तर मग, राज्याच्या कृषिमंत्र्यांनी आज दिल्लीला जाऊन नेमकी काय चर्चा केली? उपमुख्यमंत्री साहेबांनी जपानमधून फोनवरून केंद्रीय मंत्र्यांशी काय संवाद साधला? मुख्यमंत्री साहेबांनी केंद्र सरकारचं कशाबद्दल कौतुक केलं? श्रेय घेण्याच्या नादात किती बनवाबनवी करणार? "

रोहित पवार म्हणाले की, "तीन-चार दिवसांपूर्वी घेतलेला निर्णय पुन्हा जाहीर करून पियुष गोयल साहेबांनी राज्याचे कृषिमंत्री धनुभाऊ, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना वेड्यात तर काढलं नाही ना? किंवा राज्य आणि केंद्र सरकार मिळून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेड्यात तर काढत नाही ना? असा प्रश्न पडलाय."(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

Latest Marathi News Updates : श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, सत्तापालटानंतर पहिल्यांदाच होत आहे मतदान

Eknath Shinde: ...विरोध काँग्रेसला भोवणार , तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्र विकसाच्या वाटेवर

भोस्ते घाटात पुरुषाचा सापळा, कवटी अन् झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी..; स्वप्नातल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ कायम

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT