Sharad Pawar Resigns Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sakal - Saam Survey : शरद पवारांच्या राजीनाम्यावर जनतेचा कौल काय? पहा सविस्तर रिपोर्ट

वैष्णवी कारंजकर

Sakal - Saam Survey : शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर राज्यात चर्चा आणि गदारोळाला सुरुवात झाली. घराच्या उंबऱ्यापासून सोशल मीडियापर्यंत सगळीकडे याच विषयाची चर्चा आहे.

शरद पवारांचा हा निर्णय योग्य की अयोग्य, त्याचे पडसाद, त्याचे विविध पैलू याविषयी सकाळ - साम टीव्हीने केलेल्या सर्वेक्षणाचा हा अहवाल.

शरद पवारांचा हा निर्णय योग्य की अयोग्य?

शरद पवारांच्या राजीनाम्याच्या निर्णयाबद्दल सर्वपक्षीय समर्थकांची मतं जाणून घेण्यात आली आहे. यामध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे. शरद पवारांनी अध्यक्षपद सोडावे की सोडू नये याबद्दल सर्व पक्षांच्या समर्थकांना काय वाटतं, हे या सकाळ - साम टीव्हीने केलेल्या सर्वेक्षणातून जाणून घेतलं आहे.

शरद पवारांनी राजीनामा देऊन नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे, असं मत ४७.५ टक्के लोकांनी व्यक्त केलं आहे. तर त्यांचा हा निर्णय ४५.९ टक्के लोकांना पटलेलं नाही. या लोकांना शरद पवारांनी अध्यक्षपद सोडू नये असं वाटतं.

राष्ट्रवादी समर्थक काय म्हणतात?

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडू नये, असं ७३.४ टक्के लोकांना वाटतं. तर पवारांचा हा निर्णय योग्य आहे असं म्हणत २४.६ टक्के लोकांनी शरद पवारांच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. तर २ टक्के लोकांना या निर्णयाविषयी काही सांगता येत नाही. (Sakal - Saam Survey)

राष्ट्रवादीव्यतिरिक्त पक्षांचे समर्थक काय म्हणतात?

शरद पवारांचा हा निर्णय योग्य असल्याचं सांगत ५६ टक्के लोकांनी या निर्णयाचं समर्थन केलं आहे. तर ३५.६४ टक्के लोकांना वाटतं की पवारांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडू नये. या निर्णयाबद्दल काही सांगता येत नाही, असं ८.२८ टक्के लोकांना वाटतं.

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी जनतेची पसंती कोणाला?

सर्व्हेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल? या प्रश्नावर ७,७३३ नागरिकांनी मत दिलं आहे. सर्वपक्षीय समर्थकांनी दिलेल्या या कलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भविष्यातील नेतृत्व म्हणून अनेकांनी सुप्रिया सुळे (३५.२१%) यांना पसंती दिली आहे. तर त्याखालोखाल चर्चेत असलेलं नाव म्हणजे अजित पवार (३२. ११७) यांना पसंती मिळाल्याचे दिसते.मात्र, एकंदरीत सर्व्हे पाहिला तर शरद पवार (Sharad Pawar) यांच्यानंतर राष्ट्रवादीचं अध्यक्षपद हे पवार कुटूंबाबाहेरील सदस्यांना मिळावं याबद्दल फारसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. इतर पाच जणांना अल्प प्रतिसाद मिळाला आहे.

CM पदासाठी अजित पवार मविआमधून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करतील का?

यावर उत्तर देतांना ४२.५% लोकांना वाटतं की, अजित पवार भाजपसोबत जाणार नाहीत. तर यावर ३३% लोकांना वाटत ते भाजपसोबत जातील. यामध्ये २४.५ % लोक याबद्दल निश्चित सांगू शकलेले नाहीत.

भाजपने शिंदेंना सोबत घेऊन चूक केली?

भाजपने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत सत्तेत जाऊन चूक केल्याचं मत ५७.५ टक्के लोकांनी व्यक्त केलं. तर ३१.९ टक्के लोकांना ही चूक वाटत नाही. तर १०.६ टक्के लोक हे चूक की बरोबर हे सांगू शकले नाहीत. एकंदरीतच भाजपने एकनाथ शिंदेंसोबत जाणे बहुतांशी समर्थकांना आवडलेलं दिसत नाही.

शरद पवारांच्या निर्णयामुळं मविआ कोलमडणार?

सकाळ-साम टिव्हीच्या सर्व्हेनुसार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयामुळं महाविकास आघाडीवर नक्कीच परिणाम होईल, असं ६०.७ टक्के लोकांना वाटतं आहे. पवारांच्या या निर्णयामुळं मविआवर परिणाम होईल की नाही, याबाबत २८.४ टक्के लोक संदिग्ध आहेत, त्यामुळं याबाबत काही सांगता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर केवळ १०.९ टक्के लोकांना पवारांच्या राष्ट्रवादी सोडण्याच्या निर्णयामुळं मविआवर काहीही परिणाम होणार नाही, असं वाटतं आहे.

अजितदादांचा भाजपासोबत जाण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी पवारांची निवृत्ती?

'अजित पवार भाजपसोबत जातील म्हणून शरद पवारांनी निर्णय घेतला आहे, असे वाटते का? या प्रश्नावर ४१ % लोकांनी नाही असे उत्तर दिले आहे. तर ३६.६ % लोकांनी हो असे उत्तर दिले आहे. तर २२.४% लोकांनी सांगता येणार नाही असे म्हटले आहे.

अजित पवार यांनी भाजप सोबत सरकार स्थापन केले तर महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल का?

या प्रश्नावर अजित पवार यांनी भाजप सोबत जाऊन सरकार स्थापन केले तर महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल याबद्दल ५९.६ % लोकांनी नाही असे उत्तर दिले आहे. तर २०% लोकांनी हो उत्तर दिले आहे. सांगता येत नाही असं नोंदवणारी लोकं २०.३% आहेत.या रिसर्चच्या माध्यमातून समर्थकांनी दिलेल्या निष्कर्षानुसार असे दिसून येते की, अजित पवार भाजपसोबत गेले तर महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळणार नाही असं जास्त समर्थकांना वाटतं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT