महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange: बंद दाराआड तीन तास चर्चा! मनोज जरांगे अन् संभाजीराजेंचं राज्यात नवं समीकरण? बैठकीनंतर म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

Maratha Reservation: संभाजीराजे छत्रपती आणि मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यात बुधवारी तब्बत तीन तास चर्चा झाली. बंद दाराआड दोघांमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली आहे. दोघांच्या चर्चेनंतर संभाजीराजेंनी माध्यमांशी संवाद साधला.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका मी निश्चितपणे लढणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा झाली आहे. परंतु आत्ताच मी काही उघड करणार नाही. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असं मी त्यांना सांगत होतो.

संभाजीराजे पुढे म्हणाले की, जी भूमिका मनोज जरांगे पाटील यांची आहे तीच भूमिका माझीदेखील आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात एकत्र पुढे जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ते त्यांची भूमिका २९ तारखेला जाहीर करणार आहेत.

''सरकारविरोधात अनेकांची खदखद आहे.. त्यामुळे अनेकजण आमच्यासोबत येणार आहेत. आमच्या पणजोबांनी मराठा समाजासाठी आरक्षण दिलं होतं. आमचीही आज तीच भूमिका आहे.. त्यामुळे येणाऱ्या काळात निवडणुकांना कसं सामोरं जायतं ते लवकरच स्पष्ट होईल.''

दरम्यान, मनोज जरांगे पाटील २९ तारखेला काय भूमिका जाहीर करतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. जरांगे हे सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीवर ठाम आहेत. त्यामुळे सरकार ओबीसींना नाराज करुन मराठ्यांना संधी देणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : राजू शेट्टी, संभाजीराजेंसमोर 'होमपीच'वरच आव्हान; उमेदवार ठरवताना तिसऱ्या आघाडीची लागणार कसोटी

Share Market Today: शेअर बाजार नव्या उच्चांकासाठी सज्ज; कोणते शेअर्स असतील तेजीत?

Tirupati Laddu Recipe: घरीच बनवा खास तिरूपती लाडू, जाणून घ्या सोपी रेसिपी

Apple च्या आयफोन 16 सीरीजच्या विक्रीला सुरूवात, मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी रांग

Work Stress : अति ताणतणावाचा कर्मचाऱ्यांना धसका, मानसिकतेवर परिणाम; आयटी क्षेत्रात सर्वाधिक प्रमाण

SCROLL FOR NEXT