MP Supriya Sule esakal
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule : महाविकास आघाडीतील कोणता पक्षाला किती जागा मिळणार? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं...

हेमंत पवार

''विधानसभेची निवडणूक महत्त्वाची असून ती जिंकण्यासाठी नव्हे तर सत्ता बदलासाठी महत्त्वाची आहे.''

कऱ्हाड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. सध्या यावेळची विधानसभेची निवडणूक (Assembly Elections) जिंकण्यासाठी नव्हे तर सत्ता बदलासाठी महत्त्वाची आहे. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) कोणता पक्ष किती जागा लढवणार हे आठ दिवसात महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात येईल, असे स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी दिले

गुरुपौर्णिमेनिमित्त कऱ्हाड (जि. सातारा) येथील ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, महिला विभागाच्या संगीता साळुंखे, प्रभाकर देशमुख, देवराज पाटील व मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. ते निवडणूक असल्यामुळे महाराष्ट्र फिरत नाही तर कायमच फिरत असतात असे सांगून खासदार सुळे म्हणाल्या, विधानसभेची निवडणूक महत्त्वाची असून ती जिंकण्यासाठी नव्हे तर सत्ता बदलासाठी महत्त्वाची आहे. सध्या महाराष्ट्र गुंतवणूक, उद्योगात एक नंबरला दिसत नाही हे दुर्दैव आहे. ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी जागा निश्चित होईल.

मात्र, यावेळी महाविकास आघाडी यावेळी सरकार बदलणार आहे. या एमबीबीएस म्हणजेच महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारी सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार करुन पारदर्शक, भ्रष्ट्राचार मुक्त महाराष्ट्र करण्याची गरज आहे. दुधाला दर नाही, शेती अडचणीत आहे. शेती खात्यात ११८ कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचे आरएसएस सांगितल्याचे मी वाचले आहे. त्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करुन कारवाई करायला हवी होती, मात्र ती लावलेली नाही. या सरकराने शेतकऱ्याचे कंबरडे मोडायचे ठरवलेच आहे. महाविकास आघाडीतील कोणता पक्ष किती जागा लढवणार हे आठ दिवसात महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात येईल, असेही सुळे म्हणाल्या.

साताऱ्यात चिन्हाबद्दल विरोधकांचा रडीचा डाव

बारामतीच्या अगोदर साताऱ्याची सीट येणार, असा आमचा सर्व्हे होता. मात्र, दुर्दैवाने पिपाणी आणि तुतारी यात आमच्या पक्षाचे मोठे नुकसान झाले, असे सांगून खासदार सुळे म्हणाल्या, निवडणूक आयोगाकडे आम्ही चिन्हाबाबत हरकत घेतली होती. एकसारख्या चिन्हामुळे दिंडोरीला दीड लाख मते गेली. साताऱ्याला दुसरी पिपाणी नसती तर आज आमचाच खासदार असता. मात्र, विरोधक रडीचा डाव खेळत असतात. वर्ध्याला पिपाणी निवडणूक आयोगाने थांबवली, मात्र साताऱ्याला ती थांबवली नाही. त्यामुळे आमचा पराभव झाला. आम्ही पूर्ण आत्मचिंतन करुन कुठे कमी पडलो याचा विचार करुन पुढे जावू, असेही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT