CP M. rajkumar esakal
महाराष्ट्र बातम्या

पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय! नागरिकांच्या मदतीसाठी उघडणार पोलिस चौक्यांचे कुलूप; अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात तेथे होणार अंमलदारांची नेमणूक

बारा लाख लोकसंख्येच्या शहरात अवघी सात पोलिस ठाणी आहेत. शहराचा विस्तार झाल्यावर नागरिकांच्या गरजेनुसार २३ पोलिस चौक्या देखील विविध भागात सुरू झाल्या. मात्र, मागील तीन-चार वर्षांपासून त्या चौक्या कुलूपबंदच होत्या. आता पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी त्या चौक्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : बारा लाख लोकसंख्येच्या शहरात अवघी सात पोलिस ठाणी आहेत. शहराचा विस्तार झाल्यावर नागरिकांच्या गरजेनुसार २३ पोलिस चौक्या देखील विविध भागात सुरू झाल्या. मात्र, मागील काही वर्षांपासून त्या चौक्या कुलूपबंदच होत्या. आता पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी त्या चौक्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी ठाणेदारांची बैठक घेतली असून काही दिवसांत चौक्यांची दुरूस्ती होऊन त्या सुरू केल्या जातील, असेही ते म्हणाले.

सोलापूर शहर सध्या सैफूल (सोरेगाव), डोणगाव, केगाव, बार्शी रोड, अक्कलकोट रोड, तुळजापूर रोड या बाजूंनी विस्तारू लागले आहे. शहराचा विस्तार व वाढलेली लोकसंख्या, या प्रमाणात शहर पोलिस आयुक्तालयाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही ही वस्तुस्थिती आहे. तरीपण, पोलिसांचे काम उत्तमप्रकारे सुरू असून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आले आहे. परंतु, कौटुंबिक वाद किंवा अन्य गंभीर गुन्ह्याच्यावेळी नागरिकांना फिर्याद द्यायला तथा मदत मागायला पोलिस ठाण्यात दूर अंतरावरून यावे लागते. पोलिस चौक्या बंद असल्याने गुन्हा घडल्यानंतर त्यांना ठाण्यापर्यंत यायला मोठी कसरत करावी लागते, अशी स्थिती आहे. आता नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिस आयुक्तांनी ठोस निर्णय घेत बंद चौक्यांचे कुलूप उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना आता पोलिसांची मदत जलदगतीने मिळेल.

चौक्यांची दुरूस्ती करून लवकरच सुरू करण्याचे नियोजन

शहरातील विविध परिसरातील गुन्ह्यांची संख्या, नागरिकांची गरज पाहून त्या त्या भागातील पोलिस चौक्या सुरू केल्या जाणार आहेत. त्यासाठी सर्व ठाणे अंमलदारांची बैठक देखील घेतली आहे. काही चौक्यांची थोडी दुरूस्ती करावी लागेल, त्यासंदर्भातही सूचना दिल्या आहेत.

- एम. राज कुमार, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

...पण गुन्हे पोलिस ठाण्यांमध्येच होतील दाखल

काही वर्षांपूर्वी पोलिस ठाण्यांसह चौक्यांमध्ये देखील गुन्हे दाखल व्हायचे, पण काही कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या प्रकारांमुळे चौक्यांमध्ये गुन्हे दाखल करण्याचा प्रकार बंद झाला. तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या कार्यकाळात काही कारणास्तव बंद झालेल्या पोलिस चौक्या आता उघडल्या जाणार आहेत. मात्र, त्याठिकाणी तक्रार द्यायला किंवा न्याय, मदत मागायला आलेल्यांना मदत केली जाणार आहे. दरम्यान, प्रभारी अधिकाऱ्याच्या नेतृत्वात त्याठिकाणी गरजेनुसार काही अंमलदारांची नेमणूक केली जाणार आहे. गुन्ह्यांची नोंद तथा गुन्हे दाखल पोलिस ठाण्यांमध्येच होतील, अशी माहिती पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT