INDIA Alliance Meeting Esakal
महाराष्ट्र बातम्या

INDIA Alliance Meeting: 'राहुल गांधींच्या पायातल्या चपला उचलण्याचे काम उबाठाचे सैनिक करतायत',भाजप नेत्याची जहरी टीका

अंकिता खाणे (Ankita Khane)

आजपासून सलग दोन दिवस मुंबईमध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये 28 पक्षांचे जवळ जवळ 63 नेते येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. बंगळुरू आणि पाटणानंतर आता मुंबईमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या बैठकीवर मुंबई भाजपचे अध्यक्ष अशिष शेलार यांनी हल्लाबोल केला आहे.

आज मुंबई भाजपचे अध्यक्ष अशिष शेलार बोलताना म्हणाले की, आज पत्रकार परिषद घ्यायची वेळ येत आहे. हे मुंबई आणि महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. मुंबईमध्ये पोरखेळ सुरु आहे, अशा शब्दात त्यांनी इंडिया बैठकीवर टीका केली आहे. या घमंडी २८ पक्षांचा पोरखेळ चालु आहे. हे डरपोक एकटे भाजपचा सामना करूच शकत नाही. एकाची कोणाची हिमंत नाही असंही पुढे शेलार म्हणाले आहेत.

तर आमच्याकडे बरेच पंतप्रधान यांचे उमेदवार आहेत. हे उद्धवजींचं वाक्य म्हणजे बालिशपणा आहे. घरात बसून राजकारण करण्याची सवय झाली आहे. प्रत्येक विभागाला वेगळा पंतप्रधान असं आहे का? जी मंडळी जमली आहेत ते कोण? उद्धवजींनी उत्तर द्यावं असंही शेलार पुढे म्हणालेत. तर ज्यांचा आयुष्यभर बाळासाहेबांनी द्वेष केला त्यांना एकत्र बोलवून त्यांच्या पत्रावळ्या उचलत आहात. काँग्रेसच्या पत्रावळ्या उबाठाचे सैनिक उचलत आहेत, अशा शब्दांत शेलारांनी हल्लाबोल केला आहे.

परिवाराला वाचवण्यासाठी खेळ खेळत आहेत. भाजप जनतेला वाचवण्यासाठी पुढे येत आहे, असं शेलार म्हणालेत. तर त्यांनी २८ पक्षांना तुमचा नेता कोण? तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? याच उत्तर त्यांनी थेट द्यावं असं आवाहन शेलारांनी केलं आहे.

महाराष्ट्रात आम्ही ४५+ च्या पुढे जागा येणार यासाठी कामाला लागलो आहोत. मुंबईकर तुम्हाला २८ पक्षांना चलो जाओ म्हणत आहोत. कारण यात असे लोक आहेत की, २६/११ ला जो हल्ला झाला तो सर्व रिपोर्ट युपीए सरकारला होता तरी हल्ला झाला. उद्धवजी याच उत्तर देतील का? उद्धवजी तुमची भुमिका काय यावर असा सवाल देखील शेलारांनी उपस्थित केला आहे.

त्याचबरोबर ३७०ला विरोध करणारे मेहबुबा यांच्या मांडीला मांडी लावत बसत आहात. म्हणून मुंबईकरांसोबत आम्ही तुम्हाला चलो जाओ म्हणत आहोत असंही पुढे शेलार म्हणाले आहेत.

तर राहुल गांधी यांच्या पायातल्या चपला उचलण्याचे काम उबाठाचे सैनिक करत आहेत, अशा शब्दात अशिष शेलार यांनी टीका केली आहे. तर पुढे ते म्हणाले की, बाळासाहेबांची शिवसेना भाजप सोबत आहे. जे भ्रष्टाचारी आहेत ते आज राहुल गांधीसोबत आहेत. तर संजय राऊत हे मराठी विरोधी आहेत. मूर्खाच्या नंदनवनात जगणारी लोक म्हणजे उबाठा आणि काँग्रेस आहेत असंही ते पुढे म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddiqui Case: हरियाणाच्या कतार तुरुंगात कट रचला, नंतर मुंबईत आले अन् घडवलं कृत्य, चौकशीत आरोपीनं सगळचं सांगितलं!

Pune Crime : बोपदेव घाट लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे; इतर दोन आरोपींचा शोध अद्याप सुरूच

Women's T20 World Cup: निराश नका होऊ! टीम इंडिया अजूनही Semi Final ला जाणार; दुसऱ्या पराभवानंतर वाचा कसं आहे गणित

Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्ध रोमांचक विजय, Semi-Final मध्येही मारली धडक; हरमनप्रीतची फिफ्टी व्यर्थ

Football India: व्हिएतनामविरुद्धचा सामना ड्रॉ; कोच मॅनोलो मार्क्वेझ यांच्या पहिल्या विजयाची प्रतीक्षा लांबली

SCROLL FOR NEXT