Weather Update  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : राज्यभरातील पावसाने पुन्हा घेतली विश्रांती? वाचा हवामान विभागाचा अंदाज

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या महिन्यात राज्यात पावसाने दडी मारली होती. तर सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यामुळे राज्यात सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पावसाने महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावली. मात्र, कालपासून पुन्हा पावसाने एकदा विश्रांती घेतली आहे.

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पाऊस १ ते २ दिवसांची विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. आज राज्यातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे.

दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी लावणार नाहीये. तर, मंगळवारीही राज्यभरात पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. बुधवारपासून पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. बुधवारी आणि गुरुवारी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.

तर काही भागात पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे. पावसाअभावी शेती पिके कोमेजली आहेत. तर काही भागात पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. सप्टेंबर महिन्यात राज्याच्या काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

Ajit Pawar यांच्यामुळे आमच्या पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

Voter Registration : मतदार नोंदणीसाठी एकाच्याच नावावर भरले तब्बल ४६२ अर्ज, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT