teachers constituency member E sakal
महाराष्ट्र बातम्या

शिक्षक आमदार शिक्षकांचे प्रश्न आणि समस्या अधिवेशनात कधी मांडणार?

सकाळ डिजिटल टीम

प्रकाश आरोटे

मु.पो.ता.अकोले जि. अहमदनगर

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, त्यानिमित्ताने शिक्षकांना प्रश्न पडला आहे की, जे शिक्षक आमदार विधानपरिषदेत शिक्षकांसाठी आहेत, शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी आहेत, ज्यांना शिक्षकांनी निवडून दिले आहे, असे महाराष्ट्रातील शिक्षक आमदार चालू पावसाळी अधिवेशनात करत तरी काय आहेत?

एका शिक्षकांनीच आपल्या साथीदारांच्या या व्यथेला वाचा फोडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील शिक्षक प्रकाश आरोटे काय म्हणतात पाहूया...

सेवाज्येष्ठता याद्या कधी तयार होणार?

राजपत्र प्रसिद्ध होऊन आणि शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी शिक्षण आयुक्त,शिक्षण सहसंचालक,शिक्षणाधिकारी यांनी राजपत्राप्रमाणे पत्रे काढूनही चार महिने उलटले तरी राज्यातील बहुतांश संस्थाचालक पदवीप्रमाणे सेवाज्येष्ठता याद्या तयार करून पदोन्नती देण्यास टाळाटाळ करत आहेत.

त्यामुळे मागील 42 वर्षांपासून डीएड शिक्षकांवर अन्याय होत आहे. या समस्येवर शिक्षक आमदार काही बोलणार का?

जुनी पेन्शन योजना कधी पूर्ववत होणार?

मा. मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिले होते की 2 महिन्यात अहवाल सादर करून लगेच जुनी पेन्शन योजना 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना लागू करू, चार महिने उलटून गेले, अजून अहवाल नाही आणि त्यावर चर्चाही नाही!

यावर चर्चा करून याच अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू करणार का?

सातव्या वेतन आयोगाचं काय?

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी नुसार भारतातील सर्व कर्मचाऱ्यांना १०, २०, ३०-आश्वासित प्रगती योजना लागू आहे, महाराष्ट्रातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना ती लागू आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू आहे,फक्त महाराष्ट्रातील शिक्षकांना ती लागू नाही, असे का? ही योजना कधी लागू होईल? सातव्या वेतन आयोगाच्या फरकाबाबत शासन जीआर निर्गमित करते, तो सरकारी कर्मचाऱ्यांना लगेच मिळतो, शिक्षकांना तो लगेच मिळत नाही, असे का?

अशा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का?

तिसरा व चौथा हफ्ता शिक्षकांना कधी मिळणार?

शिक्षकभरतीचं काय ?

सन २०१२ पासून शासनाने शिक्षक भरती केलेली नाही, मागील अकरा वर्षांपासून अनुदानित शाळा/कॉलेजेसमध्ये गोंधळाचे वातावरण आहे, अनुदानित शिक्षक नाहीत म्हणून शिकवायला कोणी नाही, जे सीएचबी वर आहेत, त्यांना तुटपुंजे मानधन मिळते, तेच अर्धपोटी आहेत, त्यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची काय अपेक्षा ठेवणार?शिक्षक भरती करणार का?

महाराष्ट्र राज्याची शैक्षणिक प्रगती अतिशय खालावलेली आहे, असा नुकताच अहवाल प्राप्त झालेला आहे..

यावर सरकार गांभीर्याने विचार करून शिक्षक भरती लवकरात लवकर करणार काय?

शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे. राज्यातील शिक्षण संस्था आणि शिक्षण अधिकारी यांची मिलीभगत आहे. शिक्षण क्षेत्रातील हा भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकण्याची गरज आहे. त्यावर काय करणार?

पावसाळी अधिवेशन ४ ऑगस्ट पर्यंत आहे.वरीलप्रमाणे आणि असे अनेक प्रश्न आहेत, जे आपल्या शिक्षक आमदारांनी विधानसभेत किंवा विधानपरिषदेत विचारून संबंधित मंत्री व अधिकारी यांना भंडावून सोडायला हवे. आमचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडून आम्हा शिक्षकांची हीच अपेक्षा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT