Eknath Khadse Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Khadse : शरद पवारांचं ऐकलं नाही म्हणून पाच वर्ष वाया गेली, असं का म्हणाले एकनाथ खडसे?

अंकिता खाणे (Ankita Khane)

भाजपला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी घेण्याबाबत शरद पवार आपल्याला सांगत होते. मात्र, आपण त्यावेळी त्यांचं ऐकलं नाही, ही आपली मोठी चूक झाली असल्याचं विधान राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये बोलताना केलं आहे. शरद पवारांचं न ऐकल्यामुळे आपली पाच वर्ष वाया गेल्याचीही कबुली एकनाथ खडसेंनी यावेळी बोलताना दिली आहे.

पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी घ्या असं शरद पवारांनी सांगितलं होतं. मात्र आपण शरद पवार यांचं त्यावेळी एकलं नाही असंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत. त्याचं न ऐकल्याने ही आपली चूक झाली असल्याची कबुली एकनाथ खडसेंनी कार्यक्रमात दिली आहे.

'त्याचबरोबर भाजपमध्ये असताना 2019 मध्ये पक्षाने मला तिकीट दिले नाही. त्यामुळं माझी पाच वर्ष वाया गेल्याचंही खडसे म्हणाले आहेत. तर त्यावेळी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याबाबत शरद पवार मला सांगत होते. मात्र इतकी वर्ष भाजपचा विस्तार करण्यात घालवली होती. त्यामुळं पक्ष सोडून जाण्याचा विचार मनात येत नव्हता. मी संभ्रम अवस्थेत होतो', असंही खडसे म्हणाले आहेत. एकनाथ खडसे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

भाजप सोडून जाण्याचा विचार मनात येत नव्हता...

इतकी वर्ष भाजपचा विस्तार करण्यात घालवली होती. त्यामुळं पक्ष सोडून जाण्याचा विचार मनात येत नव्हता. मी संभ्रम अवस्थेत होतो', असंही खडसे म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

IND vs BAN 1st Test : Virat Kohli वर रोहित वैतागला; 'तो' एक निर्णय ज्याने अम्पायरही चकित झाले

Latest Marathi News Updates : तारापूर एमआयडीसी कंपनीमध्ये भीषण स्फोट! पाच ते सहा जण जखमी

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

SCROLL FOR NEXT