Anurag Kashyap Director comment on Animal Ranbir esakal
मनोरंजन

Anurag Kashyap On Animal : 'फिल्ममेकरला नका सांगू कसा चित्रपट बनवायचा ते'! 'अ‍ॅनिमल'ला नावं ठेवणाऱ्यांवर अनुराग कश्यप भडकला

युगंधर ताजणे

Anurag Kashyap Director comment on Animal Ranbir : रणबीर कपूरच्या अॅनिमलवरुन सध्या वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या या चित्रपटानं प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे. जेवढ्या प्रमाणात तो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे तेवढ्याच प्रमाणात तो ट्रोलही होत आहे. यात प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांना सणसणीत उत्तर दिले आहे.

अनुराग कश्यप हा त्याच्या परखड वक्तव्यासाठी आणि त्याच्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्यानं रणबीरला घेऊन बॉम्बे वॅलेट नावाचा चित्रपट केला होता. त्यात अनुष्का शर्माही होती. मात्र तो चित्रपट काही चालला नाही. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं प्रेक्षकांची निराशा केली होती. याच अनुरागनं गँग्स ऑफ वासेपूर सारखे चित्रपट करुन प्रेक्षकांची पसंती मिळवली होती.

बॉक्स ऑफिसवर अॅनिमलनं गेल्या चार दिवसांत दोनशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. यावरुन त्याची लोकप्रियता दिसून येते. ब्रम्हास्त्र नंतर रणबीरच्या आलेल्या या चित्रपटानं प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन केले आहे. रणबीरचा आजवरचा सर्वोत्तम चित्रपट म्हणून चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे. वेगळ्या प्रकारच्या या चित्रपटानं नेटकऱ्यांना मात्र तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे.

काहींनी या चित्रपटावर महिलांना अनादर करणारा चित्रपट, पुरुषसत्ताक चित्रपट, अश्लीलतेचा पुरस्कार करणारा चित्रपट अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावर आता अनुराग कश्यपच्या प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांना सणसणीत उत्तर मिळाले आहे. त्यानं न्युज १८ ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अॅनिमलच्या कंटेटवर मत व्यक्त केलं आहे.

अनुरागचं म्हणणं आहे की, मी अजून अॅनिमल पाहिलेली नाही. मी काही कामानिमित्त बाहेर होतो. मला माहिती आहे की, या चित्रपटावर खूप काही बोललं जात आहे. पण या सगळ्यात तुम्ही चित्रपट निर्मात्याला सांगू शकत नाही की त्यानं कशाप्रकारे चित्रपट बनवायचा ते...आपल्या देशात लोकं फार पटकन नाराज होतात. माझ्या चित्रपटांना देखील असाच प्रतिसाद मिळाला होता. शिकलेली लोकं एवढ्याशा गोष्टीवरुन नाराज होणार नाहीत.

चित्रपटात आपण जे काही पाहतो त्यावरुन एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यक्त होण्याची गरज नाही. समाजात अशा प्रकारची लोकं आहेत. भारतातील ८० लोकं ही कबीर सिंग सारखी आहेत. फिल्ममेकरच्या म्हणण्याप्रमाणे या गोष्टींवर मोकळेपणानं चर्चा व्हायला हवी. असे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Ravindra Jadeja: मांजरेकरांनी पुन्हा जडेजाच्या बॅटिंगवर केली पोस्ट, यावेळी काय म्हटलंय? वाचा

Latest Marathi News Live Updates : लाडकी बहीण योजनेसाठी गडबड करु नका- मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT